पुणे:- जिल्ह्यासह ग्रामीण भागात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घराची पडझड झाली आहे. त्यात मृत्यू पावलेल्या खेड तालुक्यातील वाहागाव येथील मृत मायलेकाच्या वारसांना पालकमंत्री अजित पवार यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. पवार यांनी या भागातील नुकसानग्रस्त भागाचा दौराही केला.
पुण्याच्या खेड तालुक्यातील वाहगाव येथे ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा जोर जास्त होता. पाऊस आणि वादळाचा येथील घरांना तडाखा बसला असून घराची भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अवघ्या गावावर शोककळा पसरली होती.
दरम्यान, परिस्थतीचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदतीचा धनादेश मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील, खेडचे उप विभागीय अधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल आदी अधिकारी उपस्थित होते.