अडीच वर्षात 442 नक्षलवाद्यांचा खात्मा

0

नवी दिल्ली : देशातील गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नक्षलवादी कारवायांविरोधात सुरक्षा यंत्रणांनी मोहिम गतिमान केली असून मोदी सरकार आल्यानंतर 10 नक्षल प्रभावाखालील राज्यांमधून 2014 ते 30 जून 2017 पर्यंत 442 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे.

केंद्रीय राखीव पोलिस दलाने ऑपरेशन ऑल आउट सुरू करण्यात आलेले आहे. त्यात नक्षलवाद्यांचे उच्चाटन कसे करायचे याच्या योजना आहेत. नक्षलवादी शरण येणार असतील तर तशी सोयही आहे. त्यानुसार 384 नक्षली ताब्यातही घेण्यात आले आहेत.