अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शाळा व काॅलेजना सुटी जाहीर

0


मुंबई : हवामान विभागाने पुढील 48 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्याने सोमवार दि. 5 ऑगस्ट 2019 रोजी पालघर, ठाणे, रायगड,मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शाळा व काॅलेजना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.


शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगर प्राधिकरण  क्षेत्रातील नागरिकांनी दि.5 ऑगस्ट रोजी आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. असे आवाहन देखील राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. उद्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.