अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आक्रमक; सरकारला धरले धारेवर !

0

नवी दिल्ली: आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. दरम्यान प्रथमच शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. त्यानंतर आज सुरु झालेल्या अधिवेशनात शिवसेना विरोधी बाकावर बसली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेने क्रमक पवित्रा घेत भाजप सरकारला कोंडीत पकडले आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्याबदल्यात शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत कमी असल्याचे सांगत शिवसेनेनं या मुद्यावर लोकसभेत तहकूब करण्याची नोटीस दिली आहे.

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तोकडी असून, शेतकऱ्यांना २५ हजार रूपये मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना मोदी सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी संसद परिसरात आंदोलनं केले. तसेच मदतीसाठी लोकसभेत तहकूब नोटीस दिली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तास्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. त्यासाठी केंद्रातील एका मंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला.