जळगाव: लोकशाहीत तृतीयपंथीयांनाही निवडणुकीचा अधिकार आहे. जळगाव जिल्ह्यातील भादली येथे तृतीयपंथी उमेदवाराचा विजय झाला आहे. अंजल पाटील यांनी विजय संपादन केले आहे. जळगाव येथे मतमोजणी झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या त्या पहिल्या तृतीयपंथी आहेत.