अमळनेर तालुक्यातील 40 गावातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीचे पैसे : आ.अनिल पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती
अधिवेशनात जोरदार आवाज उठविल्याने निघाला शासन निर्णय
अमळनेर : तालुक्यातील 40 गावातील शेतकरी सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पासून वंचित असताना यासाठी सतत प्रयत्न करून पावसाळी अधिवेशनात जोरदार आवाज उठविल्याने शासनाने याची दखल घेत निधी वितरणासाठी दि 30 ऑगस्ट रोजी थेट शासन निर्णय काढल्याने शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा होऊन लवकरच अतिवृष्टी चा पैसा खात्यावर जमा होणार आहे. अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. सदर निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडी शासनाच्या काळात हा निधी वितरित करण्यास मंजुरी देणारे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा आताचे विरोधीपक्ष नेते ना अजितदादा पवार यांचे विशेष सहकार्य होते त्यासाठी त्यांचे प्रथमतः आभार.दरम्यान 2019 पासून हा विषय प्रलंबित असताना आमदारकी ची सूत्रे हाती घेतल्यापासून शासन दरबारी सतत पाठपुरावा केला,सुदैवाने सत्ताधारी आमदार असल्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वैयक्तिक आग्रह धरला होता,अखेर हाय पॉवर कमिटी ने हा निधी वितरित करण्यास मान्यता दिल्याने शासनाने हे पैसे वितरित करण्यास मंजुरी दिली होती,मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकार संपुष्टात आल्याने हा पैसा मोकळा व्हावा यासाठी राष्ट्रवादी च्या शिष्टमंडळासोबत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे पैसा मोकळा करण्यासाठी आग्रह धरला होता,त्यानंतर नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील यावर जोरदार भाषण करून आवाज उठविला त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक झाले होते, दि 30 रोजी राज्यातील अतिवृष्टीचे थकीत पैसे देण्याचा शासन निर्णय काढताना अमळनेर तालुक्यातील 40 गावातील शेतकऱ्यांचा समावेश केल्याने सदर पीडित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला सदर निर्णयामुळे संबधीतांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले यासाठी मी मुख्यमंत्र्यांचे तसेच माझे चांगले मित्र तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे देखील आभार मतदारसंघाच्या वतीने मानतो. अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.