आजारी असतांनाही निवडणुकीचे काम दिल्याने मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याच्या मृत्यू !

0

मुंबई : कावीळ झालेला असतांनाही निवडणुकीच्या काम दिल्याने मंत्रालयातील एका महिला कर्मचाऱ्याचा आज मृत्यू झाला आहे. प्रिती अत्राम-दुर्वे असे मृत महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. काविळ झालेली असतानाही निवडणुकीचे काम करायला लावल्याने आजार बळावला आणि त्यामुळे प्रिती यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

प्रिती अत्राम यांनी आपल्याला ‘आजारी असल्याने सुट्टी द्यावी’ असे कुठलाही अर्ज दिलेला नव्हता. उलट जेव्हा त्यांनी बरे वाटत नसल्याचे सांगितले तेव्हा आपणच त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांना घरी न पाठवता रुग्णालयात हलवले, असे प्रिती यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी सांगितले आहे.