नवी दिल्ली – सध्या देशात गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सत्तेत असलेला पक्ष म्हणजे भाजप. भाजपला आज 39 वर्ष पूर्ण झाली आहेत. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीच्या मूल्यांवर आणि देशभक्तीच्या भावनेवर भाजपा सशक्त उभी आहे. भाजपाचे कार्यकर्ते नेहमीच देशवासियांची मदत करण्यासाठी पुढे असतात. आपल्या विकासाने पक्षाला सर्व स्तरात लोकप्रिय बनवले आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनीही कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपा एक अशी संघटना आहे. जिथे असंख्य कार्यकर्ता ज्यांचे कोणी कुटूंब नाही ते पक्षाला आपले कुटूंब मानतात. संघटनेचा विकास आणि राजकीय प्रगतीचा प्रवास नेत्यांचा त्याग, तपस्या आणि बलिदान या कारणांमुळे शक्य झाला असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय जनता पार्टीची स्थापना दिवस 6 एप्रिल 1980 मध्ये करण्यात आली होती. गेल्या 38 वर्षामध्ये पहिल्यांदाच 2014 मध्ये भाजपने बहुमतात केंद्रात सरकार स्थापन केले. यंदाचा स्थापना दिवस महत्त्वाचा आहे कारण पाच वर्ष सत्तेत राहून भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. 1951 मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली होती. 1977 मध्ये जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली जनसंघाच्या अनेक दलाचे विभाजन झाले आणि जनता पार्टीचा उदय झाला. जनता पार्टीने 1977 मध्ये काँग्रेसकडून सत्ता मिळविण्यात यश प्राप्त केले. मात्र हे सरकार जास्त दिवस टिकू शकले नाही. पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता स्थापन केली. त्यानंतर जनता दलात फूट पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. 1980 मध्ये जनता पार्टीचे विलनीकरण करुन भारतीय जनता पार्टी नाव ठेवण्यात आले. भाजपाचे युगपुरुष अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष होते. लालकृष्ण आडवाणी भाजपाचे संस्थापक सदस्य होते. भाजपाला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यास मुरली मनोहर जोशी आणि माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांचे महत्त्वाचे योगदान राहिले.
भारतीय जनता पार्टीची स्थापना दिवस 6 एप्रिल 1980 मध्ये करण्यात आली होती. गेल्या 38 वर्षामध्ये पहिल्यांदाच 2014 मध्ये भाजपने बहुमतात केंद्रात सरकार स्थापन केले. यंदाचा स्थापना दिवस महत्त्वाचा आहे कारण पाच वर्ष सत्तेत राहून भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. 1951 मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली होती. 1977 मध्ये जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली जनसंघाच्या अनेक दलाचे विभाजन झाले आणि जनता पार्टीचा उदय झाला. जनता पार्टीने 1977 मध्ये काँग्रेसकडून सत्ता मिळविण्यात यश प्राप्त केले. मात्र हे सरकार जास्त दिवस टिकू शकले नाही. पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता स्थापन केली. त्यानंतर जनता दलात फूट पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. 1980 मध्ये जनता पार्टीचे विलनीकरण करुन भारतीय जनता पार्टी नाव ठेवण्यात आले. भाजपाचे युगपुरुष अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष होते. लालकृष्ण आडवाणी भाजपाचे संस्थापक सदस्य होते. भाजपाला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यास मुरली मनोहर जोशी आणि माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांचे महत्त्वाचे योगदान राहिले.