आठवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरु; हि आहे नियमावली

मुंबई : देशातील कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. त्यानुसार, काही निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. अशातच राज्यातील कोरोनामुक्त भगाात इयत्ता आठवी ते बारावीची शाळा आजपासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शाळा सुरु करताना सरकारनं नियमावली आखून दिली आहे. त्या नियमांचं पालन करणं शाळांना बंधनकारक असणार आहे.

विद्यार्थांना शाळेतील नियमित शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतली इय्यता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करुण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सल्यानुसार मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत.

शाळा सुरु करण्यासाठी हि आहे नियमावली :

1) ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घ्यावा.
2) ज्या गावात आठवी ते बारावी वर्ग सुरु करायचे आहेत. त्या गावात किमान महिनाभर आधीपासून एकही कोविड रुग्ण नसावा.
3) शाळा सुरु करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवण्यात यावं.
4) एका बाकावर एकच विद्यार्थी आणि दोन बाकांमध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे.
5) शाळेत विद्यार्थ्यांनी सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे.
6) कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी.