अत्याचाराचा असंतोष भडकला. कुणाला वाटेल की, मुलींनी फक्त मराठा समाजावरच जोर दिला. पण तसे नसून एकंदरीत महाराष्ट्रातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय वास्तवतेला त्यांनी आव्हान उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांवरील रोख-ठोक हल्ल्याच्या पाठीमागे महाराष्ट्रातल्या सर्व मुलींच्या, मातांच्या वेदना प्रकट होत होत्या. फक्त कोपर्डीतल्या नराधमाना फाशी द्या एवढाच आशय नसून; समाजातील कुठल्याही जातीच्या महिलांवर अशा प्रकारचा प्रसंग येऊ नये. सर्व महिलांना महाराष्ट्रात मुक्त व निर्भयपणे वावरता यावे. टिंगल-टवाळीपासून ही तुमची मुलगी मुक्त नाही असे मुख्यमंत्र्यांपासून सर्वाना मुलींनी सुनावले. तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात म्हणून स्त्रियांचे संरक्षण करणे हे तुमच प्रथम काम आहे ते काम तुम्ही करू शकत नाहीत. पोलीस जसा यवतमाळसारख्या ठिकाणी जिल्हा पोलिस अधिक्षक गुंडाविरोधात तक्रार करण्यार्या मुलींनाच धमकावतो. ते गुंड भाजपचे असल्यामुळे तूम्ही गुंडांना संरक्षण देता. म्हणून फडणवीससाहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हायला लायक नाही. गुन्हेगारी आणि तिही संघटीत गुन्हेगारी यामुळेच गुन्हेगारी मानसिकता वाढली. ह्यांचे अनेक कार्यकर्ते गुन्हेगार आहेत. गुंडाविरुद्ध मोहीम घेणारे सुधाकर नाईक यांच्यावर आजच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हल्ला केला. मुंबईत दंगल घडवून सुधाकर नाईक यांना काढून टाकले आणि गुंडाराज स्थापन केले. याचा मी प्रमुख साक्षीदार आहे. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी हा तुमचा पेशा, तुम्ही कुठल्या तोंडाने सरकारला दोष देताय, तुम्ही गुन्हेगारीचा पाया रोवला. चारित्र्य संपन्न राजकीय लोकांच्या थडग्यांवर गुन्हेगारांना कवटाळून तुम्ही राज्य केले. आता तुमचीच परंपरा भाजप-शिवसेना चालवते तर तुम्ही कुठल्या तोंडाने त्यांना विरोध करताय? शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांची केविलवाणी स्थिती आहे. रांजाच्या पाटलाचे हात शिवरायांनी कलम केले, जर का जिजाऊच्या नातीच्या वाटेला जाल तर तलवारी झळकतील, असा इशारा मुलीने दिला आणि हेच झाले पाहिजे. आजच्या मुली जिजाऊ, ताराराणी झाल्या पाहिजेत आणि प्रथमतः महाराष्ट्रातील नराधमांचा चौरंग केला पाहिजे, हा निर्धार मुलीने व्यक्त केला. शिवरायांनी जमीनदारी नष्ट करून शेतकर्यांना जमीन दिली त्याच महाराष्ट्रात लोकशाहीच्या पडद्याआड अनेक नवीन जमीनदार झाले. शेतकर्यांच्या जमिनी देखील हडप केल्या. त्यांना शेतमजूर केले. कृषी शिक्षण आणि संशोधन विकृत करून खत आणि कीटकनाशकांच्या उद्योगांना मालामाल केले. जास्त खत वापरा. कीटकनाशक वापरा. अनेक होर्मोणल रसायने वापर. याने शेती करणे महाग झाले. कर्ज भरमसाट घ्यावे लागले. त्याला तेवढे उत्पन्न नाही. मग आत्महत्येशिवाय पर्याय नाही. म्हणून शेती स्वस्त केली पाहिजे.
त्यासाठी रासायनिक खत आणि कीटकनाशकांवर बहिष्कार घाला. पाळेकर गुरुजींचे शास्त्र वापरा. मोर्चात अनेक आत्महत्या केलेल्या लोकांची मुले आली होती. आमची चूक काय असे म्हणतात. शरद पवारसाहेब, उत्तर द्या. तुम्ही तर मोदिसाहेबांचे भागीदारच आहात. उत्तर कुणीच देणार नाहीत. शेतीसाठी सावकार/बँकाकडून उचलेले कर्ज आमच्या वडलांना फेडता आले नाही. बाबाने गळ्यात फास घालून घेतला अन आयुष्य संपवले. आता मागे राहिलेल्या आम्हा शेतकर्यांच्या मुलांना तरी सरकार न्याय मिळून देणार आहे? ‘नाही’ असा आवाज मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शेतकर्याच्या मुलांनी केला. महामोर्चातून शांततेचा आणि सामाजिक ऐक्याचाच संदेश मुलीनी दिला. म्हणून पुढील संघर्षात सर्व समाजानी एकसंघपणे आपल्या मागण्या मांडल्या पाहिजेत. आरक्षण हा विषय मात्र मराठा समाजाला महत्वाचा वाटतो. शेतकर्यांचे प्रश्न सोडवले असते तर आरक्षणाची मागणी वाढली नसती. पण ग्रामीण अर्थव्यवस्था काँग्रेस/ भाजप/ राष्ट्रवादी/ शिवसेना ह्या पक्षांनी उद्ध्वस्त केली. कारण सर्व नेते शहरी आहेत. त्यांना ग्रामीण भारताशी काही घेणे देणे नाही. सामाजिक ऐक्य हे राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात महत्वाचे आहे. म्हणून सर्व समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे. चमचे, दलाल हे नेतृत्वाच्या शर्यतीत असतात. त्यांना या मोर्चातून तडीपार केले पाहिजे. काहीं लोक हार्दिक पटेल बनायला बघत आहेत. त्यांना ठेचा. राजकीय पक्ष फोडा आणि राज्य करा ही भुमिका घेत आहेत. त्यांना सुध्दा बाजूला करा आणि सामाजिक समतोल निर्माण करून व्यवस्थेला गुढग्यावर आणा. त्यातच आपले भविष्य आहे.
ब्रि. सुधीर सावंत – 9987714929