कानपूर – कोरोना बाधित तबलिगींनी वैद्यकीय कर्मचार्यासोबत त्यांनी गैरवर्तवन करुन थुंकल्याचा संतापजनक प्रकार देखील समोर आला होता. परंतू आता त्यांची प्रकृती खालवत जात असल्याने ते आता जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांच्या विनावण्या करत असल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील कानपुर जिल्ह्यात तीन तबलिगींना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. सुरूवातील त्यांनी डॉक्टरांना उपचारासाठी कोणतेही सहकार्य न करता गैरवर्तन केले होते. आता या करोनाग्रस्त तबलिगींची प्रकृती बिघडत असल्याने त्यावेळी त्या तिघांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांकडे आपले प्राण वाचवण्याची विनंती केली. दरम्यान या प्रकरणी सीएमओ अशोक शुक्ला यांच्याशी काही माध्यमांनी संवाद साधला. सुरूवातीला ते तिघे वेळेवर औषधांचे सेवन करत नव्हते. वैद्यकीय कर्मचार्यांनाही ते सहकार्य करत नव्हते. परंतु आता ते डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचार्यानी सांगितलेल्या सर्व गोष्टी करत आहे. त्यांचे रडणे, विनंती करणे या सर्व मानसिक बाबी आहेत. ज्यावेळी कोणी जास्त घाबरते, त्यावेळी ते अशा प्रकारे वर्तन करते, असेही ते म्हणाले.