भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सारेच आमचे निकटवर्तीय आहेत, दूरचे कुणीही नाही. भागवत भंगाळे असतील, चंदू पटेलांचही त्यात नाव आहे, जामनेरचे आणखी दोनतीन जण आहेत हे सगळेच जवळचे आहेत. या प्रकरणात नियमानुसार कायदेशीर कारवाई होत राहील. अटक करण्यात आलेल्यांनी आम्ही सहा वर्षापुर्वीच कर्ज फेडल्याचे सांगितले आहे. यात आता आणखी काही नविन आले आहे, ठीक आहे कारवाई होत राहील अशी सावध प्रतिक्रिया भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिली.