लखनौ: १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज बुधवारी ३० रोजी ऐतिहासिक निकाल दिला. लखनौ विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी झाली. २८ वर्षापूर्वीच्या या ऐतिहासिक खटल्यातील सर्वचे सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान या निकालानंतर या प्रकरणात आरोपी मुरली मनोहर जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा खटला होता. त्याच्या निकालात निर्दोष मुक्तता झाली असल्याने आमच्यावरील गुन्हेगारीचा कलंक पुसला गेला” अशी प्रतिक्रिया मुरली मनोहर जोशी यांनी दिली आहे.
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह यांच्यासह ३२ जण या घटनेतील आरोपी होती. सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. निकालानंतर संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा होत आहे. विहिप, आरएसएससह राजकीय पक्ष आणि हिंदुवादी संघटनेकडून जल्लोष साजरा होत आहे.