आरपीडी रस्त्याचे हस्तांतरण टाळण्यासह पाच मागण्यांसाठी ईशारा आंदोलन

0

जगन सोनवणेंसह शेकडो नागरीकांचा सहभाग ; 23 पासून आमरण उपोषण

भुसावळ- पालिकेच्या अखत्यारीतील आरपीडीरोडचे रेल्वेकडे हस्तांतरण टाळावे, रेल्वेच्या हद्दीतील पाच हजार झोडपट्टी तोडून 20 हजार नागरीक विस्थापीत झाल्याने नुकसानीचे पंचनामे तयार करून प्रत्येक कुटुंबास पाच लाख रुपये भरपाई द्यावी व सातबारा उतारा द्यावा, भुसावळ रेल्वे दवाखान्यामागील समता नगर, आंबेडकर नगर, रूपवते सोसायटी, कंडारी झोपडपट्टी हटवू नये, रेल्वेतील नोकरीसाठी असलेल्या अ‍ॅप्रेंटीस धारकांना नोकरी द्यावी तसेच त्यांच्यावरील गुन्हे रद्द करावे तसेच भुसावळ रेल्वे उत्तर वॉर्डातील भुसावळ पालिकेच्या मालकिच्या जागेवरील बेकायदेशीररीत्या काढलेले अतिक्रमित जागेची मोजणी करून पुन्हा नियमानुसार भाडे कर वसुल करून जागा अतिक्रमितांना द्यावी या पाच प्रमुख मागण्यांसाठी कामगार नेते तथा माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर शेकडो नागरीकांच्या उपस्थितीत ईशारा आंदोलनाला सुरुवात केली आहे. मागण्याची दखल न घेतल्यास आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यात 23 पासून बेमुदत आमरण उपोषण तर 26 जानेवारी रोजी तिरंगा ध्वज घेवून भुसावळ-जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च तसेच याच दिवशी जिल्हाभरात दहा ठिकाणी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा सोनवणे यांनी दिला आहे.

ईशारा आंदोलनात यांचा सहभाग
प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर सुरू करण्यात आलेल्या इशारा आंदोलनात अशोक पारधे, मौलाना अब्दुल, नईम पिंजारी, राजा प्रजापती, सोमकुमार कनोजिया, दिलीप जोनवाल, शेख निसार, सुनील कापसे, कैलास वारूळकर, रत्ना सुरवाडे, संगीता ब्राह्मणे, किरण पवार यांच्यासह अनेक नागरीक, महिला सहभागी झाल्या आहेत.