पुणे । गेल्या आठवड्याच्या तुलनेत राज्यासह परराज्यांमधून होणारी फळभाज्यांची आवक घटली आहे. मात्र सरासरीच्या तुलनेत चांगली आवक झाली. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने आले, काकडी, वांगी आणि बीटच्या दरात वाढ झाली. तर, मटार, पावटा यांच्या दरात घट झाली आहे. काही दिवसांपुर्वी चाळीशी पार केलेल्या कांद्याची आवक घटल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आवक घटूनही कांद्याच्या दरात घट झाली असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली.
गुलटेकडी येथील मार्केटयार्डात राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 225 ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. त्यामध्ये परराज्यातून प्रामुख्याने आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमधून 5 ते 6 टेम्पो शेवगा, गुजरात आणि कर्नाटकमधून 20 ते 22 टेम्पो हिरवी मिरची, मध्यप्रदेशातून 7 ते 8 ट्रक गाजर, कर्नाटकातून 2 टेम्पो भूईमुग, गुजरात व कर्नाटकातून 8 ते 10 ट्रक कोबीची आवक झाली आहे. स्थानिक भागातून सातारी आल्याची 1500 ते 1600 पोती, टॉमेटो पाच ते साडे पाच हजार पेटी, फ्लॉवर 15 ते 16 टेम्पो, कोबी 15 ते 16 टेम्पो, सिमला मिरची 7 ते 8 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, पावटा 6 ते 7 टेम्पो, भेंडी 8 ते 10 टेम्पो, गवार 8 ते 10 टेम्पो, भुईमुग शेंगाची 100 पोती, पुरंदर, वाई, सातारा आणि पारनेर येथून मटारची 1 हजार पोती, कांद्याची 50 ते 60 ट्रक, आग्रा, इंदौर व गुजरात येथून बटाट्याची 45 ते 50 ट्रक आवक झाली. मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची 5 ते साडे पाच हजार गोणींची आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : 170-210, बटाटा : 60-100, लसूण : 250-450, आले सातारी : 180-240, भेंडी : 150-200, गवार : गावरान व सुरती 150-220, टोमॅटो : 200-300, दोडका : 100-200, हिरवी मिरची : 200-250, दुधी भोपळा : 60-120, चवळी : 150-200, काकडी : 60-100, कारली : हिरवी 150-200, पांढरी : 100, पापडी : 140-160, पडवळ : 200-220, फ्लॉवर : 60-100, कोबी : 50-100, वांगी : 200-300, डिंगरी : 140-150, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 150-200, तोंडली : कळी 240-250, जाड : 100-110, शेवगा : 300, गाजर : 160-200, वालवर : 200-220, बीट : 150-180, घेवडा : 150-200, कोहळा : 100-150, आर्वी: 200-250, घोसावळे : 150-200, ढेमसे : 180-200, मटार : स्थानिक : 200-300, पावटा : 150-200, भुईमंग शेंगा 400-450, तांबडा भोपळा : 60-100, सुरण :250-280, मका कणीस : 50-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.
पावसामुळे पालेभाज्यांचा दर्जा खालावला
गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने त्याचा फटका पालेभाज्यांना बसलेला दिसून येत आहे. सध्या बाजारात दाखल होत असलेल्या पालेभाज्यांचा दर्जा खालावला असून चांगल्या दर्जाच्या मालाला चांगले दर मिळत आहेत. रविवारी मार्केटयाडार्तील बाजारात कोथिंबीरची 1 लाख जुडींची तर मेथीची 50 हजार जुडींची आवक झाली. कोथिंबीरीची आवक घटल्याने दरात 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली. तर, मेथी, कांदापातच्या दरात घट झाली असल्याची माहिती व्यापार्यांनी दिाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :
कोथिंबीर : 500-1000, मेथी : 500-800, शेपू : 300-500, कांदापात : 500-1000, चाकवत : 400-500, करडई : 400-500, पुदिना : 300-500, अंबाडी :500-600, मुळे : 500-1000, राजगिरा : 400-500, चुका : 500-700, चवळई : 400-700, पालक : 600-700.
कलिंगड, खरबुजाच्या दरात घट
गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळविभागामध्ये रविवारी सर्व प्रकारच्या फळांच्या आवकेत मोठी वाढ झाली. गणेशोत्सवा दरम्यान धार्मिक विधी तसेच प्रसादासाठी फळांचा वापर होत असल्याने मागणीत वाढ झाली आहे. मागणी इतकीच आवक कायम असल्याने सर्व प्रकारच्या दर स्थिर आहेत. मात्र, मागणीअभावी कलिंगड आणि खरबुजाच्या दरात घट झाल्याची माहिती व्यापार्यांनी दिली.
दोन दिवसांत गौरीचे आगमन होणार असल्याने येत्या काळात फळांच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. फळबाजारात प्रामुख्याने अननस तीन ट्रक, मोसंबीची 55 ते 60 टन, संत्र्याची 8 ते 10 टन, डाळिंबाची 150 ते 200 टन, पपई 20 ते 22 टेम्पोे, लिंबाची अडीच ते 3 हजार गोणी, चिक्कू 1 हजार बॉक्स, पेरुची 300 ते 350 ट्रे, कलिंगडाची 20 ते 25 टेम्पो आणि खरबुजाची 8 ते 10 टेम्पो, सफरचंद, प्लम, नासपती आणि पिअरची 6 ते 7 हजार डाग तर सिताफळाची अडीच टन आवक झाली असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
फळांचे दर पुढीलप्रमाणे :
लिंबे (प्रति गोणी) : 50-300, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 120-220, (4 डझन ) : 50-130, संत्रा : (3 डझन) 150-300, (4 डझन) : 80-150, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 20-70, गणेश 10-30, आरक्ता 20-40 कलिंगड : 5-15, खरबुज : 10-25, पपई : 3-20, चिक्कू : 100-400, पेरू (20 किलो) : 500-600, सिताफळ : 10-150, सफरचंद : सिमला (20 ते 25 किलो) : 1500-2000, गोल्डन (20 ते 25 किलो) 1000-1500, प्लम (5 ते 6 किलो) : 500-600, नासपती (15 किलो) : 700-800, पिअर (15 किलो) : 700-1200.
फुलांची मागणी वाढली
गणरायाच्या आगमनामुळे सर्व प्रकारच्या फुलांना मागणी वाढली आहे. मार्केटयार्डातील फुलबाजारात जिल्ह्याच्या विविध भागातून फुलांची चांगली आवक होत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने सर्व प्रकारच्या फुलांच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने फुलांचा दर्जा घटला ओह. सध्या बाजारात दाखल होत 50 टक्के माल ओला असल्याने त्यास कमी दर मिळत आहे. फुलबाजारात जिल्ह्यासह सोलापूर, वाई, सातारा आणि सोलापूर येथून झेंडूच्या फुलांची तर कर्नाटकातूनही शेवंतीची सर्वाधिक आवक होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे :
झेंडू : 60-120, गुलछडी : 160-300, बिजली : 100-140, कापरी : 80-120, शेवंती : 200-300, ऑस्टर : 15-25, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 15-30, गुलछडी काडी : 20-30, डच गुलाब (20 नग) : 60-100, लिलि बंडल : 15-25, अबोली लड : 200-300, जबेर्रा : 30-60, कार्नेशियन : 100-180, जुई : 400-600.
मासळीची मागणी घटली
गणेश पेठेतील मासळी बाजारात पश्चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक सुरू झाली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने मासळीच्या दरात किंचितशी घट झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले. गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर मागणी वाढण्याची शक्यता असल्याचेही व्यापार्यांनी सांगितले. गावरान अंड्याच्या दरात शेकड्यामागे तब्बल 30 तर इंग्लिश अंड्याच्या दरात 20 रुपयांनी घट झाली. रविवारी गणेश पेठेतील घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे 8 ते 10 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 300 ते 500 किलो आणि नदीतील मासळीची सुमारे 200 ते 300 किलो इतकी आवक झाली तर आंध्रप्रदेशातील रहु, कतला, सीलन या मासळींची सुमारे 5 ते 6 टन आवक झाल्याचे सांगितले.
मासळीचे दर पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो) :
पापलेट : कापरी : 1300-1400, मोठे : 1200, मध्यम : 750, लहान : 550, भिला : 400, हलवा : 320-400, सुरमई : 440, रावस लहान : 440, मोठा : 500, घोळ : 400, करली : 200-280, करंदी ( सोललेली ) : 240, भिंग : 240, पाला : 800-1200, वाम : 200-360, ओले बोंबील : 60-100, कोळंबी : लहान : 200, मोठी :
400, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1400, मोरी : 200-280, मांदेली : 80, राणीमासा : 160, खेकडे : 160-200, चिंबोर्या : 360-400. खाडीची मासळी : सौंदाळे : 180-200, खापी : 160-200, नगली : 200-400, तांबोशी : 400, पालू : 200, लेपा : 100, शेवटे : 200, बांगडा : 160, पेडवी : 60, बेळुंजी : 100, तिसर्या : 160, खुबे : 120, तारली : 100.
नदीची मासळी : रहू : 140, कतला : 140, मरळ : 320, शिवडा : 160,चिलापी : 80, मांगूर : 120, खवली : 60, आम्ळी : 60, खेकडे : 160, वाम : 400
मटण : बोकडाचे : 440, बोल्हाईचे : 440, खिमा : 440, कलेजी : 480.
चिकन : चिकन : 130, लेगपीस : 160, जिवंत कोंबडी : 100, बोनलेस: 230.
अंडी : गावरान : शेकडा : 620, डझन : 84 प्रति नग : 7. इंग्लिश : शेकडा : 365 डझन : 48 प्रतिनग : 4.