आवक वाढल्याने फळभाज्या, पालेभाज्या झाल्या स्वस्त

0

पुणे । श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक भाजीपाला बाजारात आवक वाढली आहे. मात्र पावसामुळे बाजार खरेदीदारांची संख्या घटल्याने टोमॅटो, शिमला मिरची, शेवगा आणि गाजर वगळता इतर सर्वच फळभाज्यांच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. बाजारात 170-180 ट्रक इतकी भाज्यांची आवक झाली आहे. त्यामध्ये परराज्यातून प्रामुख्याने आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून शेवगा 5 ते 6 टेम्पो, कर्नाटकमधून 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकातून 150-200 गोणी मटार, गुजरात, कर्नाटकातून कोबीची 10 ते 12 ट्रक, इंदौरहून 7 ते 8 टेम्पो गाजर, कर्नाटकातून 2 टेम्पो श्रावण घेवडा तर स्थानिक भागातून सातारी आले 1400 ते 1500 गोणी, टोमॅटो अडीच ते तीन हजार पेटी, फ्लॉवर 18 ते 20 टेम्पो, कोबीची 8 ते 10 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, वाशी बाजार समितीतून 2 ते 3 टेम्पो वांगी, गाजर आणि डांगर, तर भुईमुगाची 200 पोती इतकी आवक झाली. याशिवाय कांद्याची 70 ते 80 ट्रक, उत्तर प्रदेश, आग्रा, इंदौर आणि गुजरातमधून बटाट्याची 30 ते 40 ट्रक, मध्य प्रदेशातून लसणाची पाच ते साडे पाच हजार गोण्यांची आवक झाल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : 60-85, बटाटा : 60-90, लसूण : 200-550, आले सातारी : 160-220,
भेंडी : 100-200, गवार : 200-300, टोमॅटो : 400-500, दोडका : 200-250,
हिरवी मिरची : 300-500, दुधी भोपळा : 50-100, चवळी : 100-150, काकडी :
140-180, कारली : हिरवी 250-300, पांढरी : 150-200, पापडी : 100-200,
पडवळ : 200-250, फ्लॉवर : 60-100, कोबी : 60-120, वांगी : 100-200,
डिंगरी : 120-150, नवलकोल : 100-120, ढोबळी मिरची : 300-350, तोंडली :
कळी 200-220, जाड : 100-110, शेवगा : 350-450, गाजर : 140-160, वालवर :
200-250, बीट : 120-150, घेवडा : 300-350, कोहळा : 100-150, आर्वी :
200-300, घोसावळे : 150-180, ढेमसे : 150-200, मटार : स्थानिक :
500-600, पावटा : 250-300, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 280-300, मका
कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600, भुईमूग : 300-400.

पालेभाज्या झाल्या स्वस्त
गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढल्याने कोथिंबीर, मेथीसह सर्वप्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. रविवारी बाजारपेठेत कोथिंबिरीची दीड लाख जुडी, मेथीची एक लाख जुडींची तसेच शेपूची 25 ते 30 हजार जुडींची आवक झाली.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : 300-1000, मेथी : 400-800,
शेपू : 500-700, कांदापात : 500-1000, चाकवत : 500-600, करडई : 400-500,
पुदिना : 300-400, अंबाडी : 500-600, मुळे : 1200-1500, राजगिरा :
400-500, चुका : 700-800, चवळई : 500-600, पालक : 400-600.

फळे महागली
गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू असल्याने फळांची आवक घटली आहे. त्यामुळे
डाळींब, पपई, खरबूज, कलिंगड, पेरु आणि चिक्कुच्या भावात वाढ झाली. लिंबाची आवक वाढल्याने लिंबाच्या दरात घट झाली असून संत्रा, मोसंबी, सिताफळ, अननस, प्लम, पीच, पिअरच्या भाव स्थिर होते. फळबाजारात प्रामुख्याने केरळहून अननसाचे सहा ट्रक, मोसंबी 25 ते 30 टन, संत्रा 2 टन, डाळिंब 60 ते 70 टन, पपई 10 ते 12 टेम्पोे, चिक्कू 100 गोणी, दशहरी, लंगडा आणि चौसा आंबे अडीच ते 3 हजार पेटी, प्लम, पीच आणि पिअर दीड ते 2 हजार पेटी, पेरुची तीनशे ते साडेतीनशे क्रेट इतकी आवक झाली. याशिवाय कलिंगड 8 ते 10 टेम्पो, खरबुज 5 ते 6 टेम्पो तर लिंबाची 7 ते 8 हजार गोणी इतकी आवक झाली.

फळांचे दर पुढीलप्रमाणे :
लिंबे (गोणीस) 50-100, अननस (डझन) 70-270, मोसंबी : (3 डझन) : 130-250,
(4 डझन) : 40-120, संत्रा (3 डझन) 130-250, (4 डझन) : 40-120, (प्रति
किलोस) डाळिंब : भगवा : 20-70, गणेश 5-25, आरक्ता 10-40, कलिंगड 5-14,
खरबुज 10-30, पपई 5-15, चिक्कू 100-600, पेरू (20 किलो) : 400-850, दशहरा
(5 ते 6 कि.): 600-700, लंगडा 450-600, चौसा 450-600, प्लम (5 कि.) :
400-600, पीच (10 कि.) : 1000-1200, पिअर (10 ते 12 कि.) : 800-1100.

फुलांचे दर घटले
आवक वाढल्याने फुलांच्या दरामध्येही 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर फुलांना मागणी वाढेल, असा अंदाज व्यापार्‍यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने चांगल्या दजार्चा माल बाजारात दाखल होत होता. आता मात्र पुन्हा बाजारातील फुलांचा दर्जा खालावला आहे.

(प्रतिकिलोचे भाव) पुढीलप्रमाणे : झेंडू : 10-30, गुलछडी : 120-160,
बिजली 60-100, कापरी : 20-40, मोगरा : 200-300, ऑस्टर : 15-25, (गड्डीचे
भाव) गुलाबगड्डी : 2-5, ग्लॅडिएटर 2 ते 5, गुलछडी काडी : 5-20, डच गुलाब
(20 नग) : 20-50, लिलिबंडल : 2-5, जर्बेरा : 5-20, कार्नेशियन : 20-50.

पापलेट, सुरमई महागली
गेल्या आठवड्यात गुरुपौर्णिमा, संकष्ट चतुर्थी असल्यामुळे मासळीला मागणी
कमी होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून मासळीची मागणी दुप्पट वाढली आहेत. त्यामुळे पापलेट, सुरमई आणि वाम यांच्या भावात वाढ झाली आहे. तर करली, करंदी, भिंग, कोळंबी, तांबोशी, यांच्या भावात किंचित घट झाली आहे. गणेश पेठेतील घाऊक बाजारात रविवारी खोल समुद्रातील 10 ते 12 टन, खाडीची मासळी 200 ते 300 किलो आणि नदीतील मासळीची 500 ते 600 किलो आवक झाली. आंध्र प्रदेशातील रहू, कतला, सीलन या मासळींची आवक 14 टन झाली.

भाव (प्रतिकिलो)
पापलेट कापरी : 1600 मोठे : 1400 मध्यम : 1000 लहान : 700, भिला : 600,
हलवा : 650, सुरमई : 650, रावस लहान : 700 मोठा : 750, घोळ : 550, करली : 320, करंदी (सोललेली) : 320, भिंग : 360, पाला : 1000-1200, वाम : 750, ओले बोंबील : 140-200, कोळंबी लहान : 380, मोठी : 400, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स
: 750, लॉबस्टर : 1400, मोरी : 280, मांदेली : 120, राणीमासा : 200, खेकडे : 200, चिंबोर्‍या : 480.

खाडीची मासळी
सौंदाळे : 280, खापी : 280, नगली : 400-650, तांबोशी : 400, पालू : 240, लेपा
: 240, शेवटे : 280, बांगडा : 160, पेडवी : 80, बेळुंजी : 140, तिसर्‍या :
160-180, खुबे : 160, तारली : 140.

नदीची मासळी
रहू : 140, कतला : 160, मरळ : 400, शिवडा : 160, चिलापी : 60, मांगूर : 130,
खवली : 160, आम्ळी : 60, खेकडे : 180, वाम : 400.
मटण : बोकडाचे : 440, बोल्हाईचे : 440, खिमा : 440, कलेजी : 480.
चिकन चिकन : 160, लेगपीस : 190, जिवंत कोंबडी : 120, बोनलेस : 260.
अंडी : गावरान शेकडा : 600, डझन : 84, प्रतिनग : 7, इंग्लिश शेकडा : 360, डझन : 48, प्रतिनग : 4.

आवक घटल्याने चिक्कूचे भाव वाढले
रविवारी मार्केट यार्डात चिक्कूची अवघी 100 गोणी इतकी आवक झाली. मागणी चांगली असल्यामुळे भावाही वाढले आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चिक्कूची आवक घटत चालली आहे. मार्केट यार्डात सध्या होणारी चिक्कूची आवक ही गुजरात राज्यातील घोलवड आणि डहाणू परिसरातून होत आहे. त्याठिकाणी सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे चिक्कूचे नुकसान होत आहे.

जुन्नर तालुक्यातील गावरान चिक्कूचीही आवक मार्केट यार्डात होत असते. मात्र, तेथील चिक्कूचा हंगाम सुरू होण्यास आणखी एक महिन्याचा अवधी आहे. गुजरातमधून आवक होणार्‍या मोठ्या चिक्कूचे नुकसान होत आहे. मात्र, लहान चिक्कू बाजारात दाखल होण्यास आणखी पंधरा दिवसांचा अवधी आहे. त्यांची आवक सुरू झाल्यास दर आवाक्यात येतील, असा अंदाज व्यापार्‍यांनी वर्तविला. किरकोळ बाजारात प्रतिकिलोस 100 ते 150 रुपये किलोने विक्री केली जात आहे.