उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी राज ठाकरेंनी माफी मागावी-संजय निरुपम

0

मुंबई- उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून मनसे प्रमुख राज ठाकरे हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.

मनसेकडून उत्तर भारतीयांना होणारी मारहाण आणि त्यांना देण्यात येणाऱ्या हीनतेच्या वागणुकीप्रकरणी राज ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे, असे निरुपम यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचे निमंत्रण स्वीकारल्याने निरुपम यांनी समाधान व्यक्त केले आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वीकारले आहे. कांदिवलीतील भुराभाई हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमामधून राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत.

उत्तर भारतीयांवर कायम टीका करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे आता उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण राज ठाकरेंना देण्यात आलं होतं. हे निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारलं आहे. 2 डिसेंबर रोजी कांदिवलीच्या भुराभाई हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात राज ठाकरे यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमातून राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधतील. उत्तर भारतीय महापंचायतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

परप्रांतीयांचे लोंढे, त्यामुळे सोयी-सुविधांवर पडणारा ताण, फेरीवाल्यांच्या समस्या यावरुन राज ठाकरेंनी अनेकदा उत्तर भारतीयांवर टीकास्त्र सोडलं आहे. मनसे स्टाईल राड्याचा फटका आतापर्यंत अनेकदा उत्तर भारतीयांना बसला आहे. मात्र आता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. 2 डिसेंबरला हा कार्यक्रम कांदिवलीत होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राज यांना 12 ऑक्टोबरला देण्यात आले होते.