पुणे । उन्हाचा कडाका वाढल्याने मार्केटयार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक घटली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून फळभाज्यांना दर कमी मिळत आहे. वाढत्या उष्णतेचा फटका बसण्याबरोबर भाव नसल्याने शेतकर्यांनी शेतातील पिके उपटून टाकली त्याचा परिणाम बाजारातील आवकेवर झाला आहे. आवकच्या तुलनेत मागणी घटल्याने आले, घेवडा आणि मटारच्या दरात वाढ झाली आहे. तर गवार आणि भेडीच्या दरात घट झाली आहे. इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत.
रविवारी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात सुमारे 150 ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यातून हिमाचल प्रदेशमधून 1 ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून 3 ते 4 ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गुजरात येथून 14 ते 15 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 3 ट्रक गाजर, कर्नाटकातून तोतापुरी कैरी 5 ते 6 टेम्पो, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची चार ते साडे चार हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले 700 ते 800 पोती, टॉमेटो साडेपाच ते 6 हजार पेटी, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 14 ते 15 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, मटार 200 ते 250 गोणी, भेंडी 10 ते 12 टेम्पो, ढोबळी मिरची 14 ते 15 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, गावरान कैरी 8 ते 10 टेम्पो, चिंच 25 ते 30 पोती, कांद्याची 120 ट्रक, आग्रा, इंदौर, नाशिक आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची 55 ते 60 ट्रक इतकी आवक झाली.
मागणी वाढल्याचे मासळी महागली
मागणी वाढल्याने सर्वच मासळीच्या दरात 5 ते 6 टक्क्यांनी वाढ झाली. मात्र मागणी आणि पुरवठा सारखा असल्याने चिकनचे दर स्थिर आहेत. रविवारी मासळी बाजारात खोल समुद्रातील 8 ते 10 टन, खाडीची सुमारे 200 ते 300 किलो, नदीची सुमारे 1 ते दिड टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला, सिलन यांची 10 ते 12 टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा कि.चे भाव
कांदा : 65-80, बटाटा : 120-160, लसूण : 150-300, आले : सातारी: 300-320, भेंडी : 200-250, गवार : 250-400, टोमॅटो : 30-60, दोडका : 150-200, हिरवी मिरची : 200-300, दुधी भोपळा : 50-100, चवळी : 160-180, काकडी : 60-80, कारली : हिरवी 180-200, पांढरी : 90-100, पापडी : 140-150, पडवळ : 160-180, फ्लॉवर : 50-80, कोबी : 20-40, वांगी : 100-200, डिंगरी : 140-160, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 150-220, तोंडली : कळी 200-250, जाड : 90-100, शेवगा : 150-200, गाजर : 60-80, 100-140, वालवर : 140-160, बीट : 40-60, घेवडा : 300-400, कोहळा : 100-150, आर्वी : 200-250, घोसावळे : 140-150, ढेमसे : 150-200, भुईमूग : 300-350, पावटा : 300-400, मटार : परराज्य : 450-500, स्थानिक : तांबडा भोपळा : 40-80, कैरी : तोतापुरी : 200-250, गावरान : 150-200, चिंच : (अखंड) : 300-320, फोडलेली : 600-650, सुरण : 240-250, मका कणीस : 50-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.
पालेभाज्यांमधील तेजी कायम
उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत मुळे, चवळई, पालक वगळता पालेभाज्यांच्या दरातील तेजी टिकून आहे. पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम असल्याने किरकोळ बाजारात पालेभाज्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात 3 ते 12 रुपये मोजावे लागत आहेत आहेत. किरकोळ बाजारात 10 ते 25 रुपये भावाने जुडीची विक्री होत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. रविवारी मार्केटयार्डातील तरकारी विभागात कोथिंबीरीची सुमारे 1 लाख 25 हजार तर मेथीची 15 हजार जुडींची आवक झाल्याचे सांगण्यात आले.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)
कोथिंबीर : 300-1200, मेथी : 1000-1400, शेपू : 700-1000, कांदापात : 400-700, चाकवत : 500-700, करडई : 400-500, पुदिना : 100-150, अंबाडी : 500-800, मुळे : 500-800, राजगिरा : 500-600, चुका : 500-800, चवळई : 500-600, पालक : 400-700, हरभरा गड्डी : 400-600.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर)
पापलेट : कापरी : 1400-1500, मोठे : 1400, मध्यम : 1000, लहान : 850, भिला : 600, हलवा : 600, सुरमई : 600-700, रावस-लहान : 650, मोठा : 850, घोळ : 550, करली : 280, करंदी : सोललेली 280, भिंग : 360, पाला : 550-1300, वाम : पिवळी 320, मोठी 550, ओले बोंबील : 180, कोळंबी ः लहान : 240, मोठी : 480, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 850, लॉबस्टर : 1500, मोरी : 200-360, मांदेली : 120, राणीमासा : 240, खेकडे : 200, चिंबोर्या : 440.
खाडीची मासळी : सौंदाळे : 280, खापी : 240, नगली :400, तांबोशी : 440, पालू : 200, लेपा : 200, शेवटे : 280, बांगडा : लहान : 120, मोठे : 180, पेडवी : 80, बेळुंजी : 140, तिसर्या : 180-200 खुबे : 140, तारली : 120
नदीची मासळी : रहू : 160, कतला : 160, मरळ : 400, शिवडा : 220, चिलापी : 60, मागुर : 150, खवली : 220, आम्ळी : 100 खेकडे : 240, वाम : 550.
मटण : बोकडाचे : 460, बोल्हाईचे : 460, खिमा : 460, कलेजी : 480.
चिकन : चिकन : 130, लेगपीस : 170 जिवंत कोंबडी : 100, बोनलेस : 240. अंडी : गावरान : शेकडा : 580, डझन : 84 प्रति नग : 7. इंग्लिश : शेकडा : 312 डझन : 48 प्रतिनग : 4.
फुलांचे दर घसरले
ढगाळ हवामानामुळे जिल्ह्याच्या विविध भागातून मार्केटयार्डातील फूलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढली आहे. सध्या सण, लग्नसराई संपली आहे. मात्र, काही भागात यात्रा, जत्रा सुरू आहेत. त्यामुळे झेंडू, गुलछडी आदी फुलांना अत्यल्प मागणी आहे. विशेषतः सर्वच उत्सव तसेच लग्नसराई संपल्याने फुलांना फारसा उठाव नाही. आवकेच्या तुलनेत मागणी कमी असल्याने फुलांच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे.
फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे
झेंडू : 10-60, गुलछडी : 60-150, बिजली : 20-50, कापरी : 16-25, अस्टर : 8-20, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 8-15, ग्लडिएटर : 10-12, गुलछडी काडी : 10-30, डच गुलाब (20 नग) : 30-70, लिलिबंडल : 2-8, जर्बेरा : 10-25, कार्नेशियन : 20-60, मोगरा : 60 – 300.
फळांचे दर
लिंबे (प्रति गोणी) : 300-1100, अननस (डझन) : 70-280, मोसंबी : (3 डझन) : 160-400, (4 डझन ) : 60-220, संत्रा : (3 डझन) 200-400, (4 डझन) : 100-220, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : 30-120, गणेश 10-40, आरक्ता 20-60. कलिंगड : 5-10, खरबूज : 5-18, पपई : 5-15, चिक्कू : 100-500, पेरू (20 किलो) : 300-500, सफरचंद : सिमला (25 किलो) : 1500-1700, काश्मीर डेलीशियस (15 किलो) 900-1200, किन्नोर : (25 किलो) 1800-2000, द्राक्षे : तासगणेश (15 किलो) 800-1000, सुपर सोनाका (15 किलो) : 1200-1400, थामसन (15 किलो) : 550-650, आंबा : लालबाग 40- 70, बदाम 55-70, कर्नाटक : पायरी (2 डझन) 250-450, हापूस (2 डझन) 450-700, तोतापुरी 50-70.
पपई, पेरुच्या दरात घट
उन्हाची तीव्रता वाढल्याने बाजारात रसदार कलिंगड, खरबूज, डाळींब, संत्री व मोसंबीला मागणी वाढली आहे. मागणी इतकीच आवक कायम असल्याने या फळांचे दर स्थिर आहेत. मागणीअभावी पपई, सफरचंद, पेरूच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी घट तर हंगाम अंतिम टप्प्यात येऊन आवक घटल्याने द्राक्षांचे दर 10 ते 20 टक्क्यांनी वधारले आहेत. शहरातील रसवंतीगृहे, गुर्हाळे यांकडून लिंबाना चांगली मागणी असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. रविवारी येथील फळबाजारात अननस 7 ट्रक, मोसंबी 50 टन, संत्री 15 ते 20 टन, डाळींब 30 ते 35 टन, पपई 8 ते 10 टेम्पोे, लिंबाची 3 ते 3.5 हजार गोणी, चिक्कू2 हजार डाग, पेरु 70 क्रेटस्, कलिंगड 30 ते 40 टेम्पो, खरबूज 20 ते 25 टेम्पो, सफरचंद 800 ते 1 हजार पेटी, आंबा 6 ते 7 हजार पेटी, द्राक्षे 5 ते 6 टन इतकी आवक झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले.