उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक घटली

0

पुणे । उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी अधिक असल्याने भेंडी, गवार, हिरवी मिरची, सिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, वांगी, घेवडा, बीट आणि पावटाच्या भावात सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे वाढलेले भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात सुमारे 150 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. हिमाचल प्रदेश येथून 2 ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून 4 ते 5 ट्रक कोबी, ओरिसा, कर्नाटक आणि गुजरात येथून 14 ते 15 टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून 4 ते 6 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी 7 ते 8 टेम्पो, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून चार ते साडेचार हजार गोणी इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले 1700 ते 1800 पोती, टॉमेटो साडेपाच ते सहा हजार पेटी, फ्लॉवर 15 ते 16 टेम्पो, कोबी 10 ते 12 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 10 ते 12 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, हिरवी मिरची 7 ते 8 टेम्पो, भेंडी 10 ते 12, गावरान कैरी 8 ते 10, कांद्याची 100 ट्रक, आग्रा, इंदौर, गुजरात आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची 50 ते 55 ट्रक, भुईमुगाची 150 पोती इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : 50-85, बटाटा : 130-170, लसूण : 100-250, आले : सातारी : 580-600, भेंडी : 200-300, गवार : 200-300, टोमॅटो : 40-60, दोडका : 200-300, हिरवी मिरची : 300-400, दुधी भोपळा : 50-100, चवळी : 150-180, काकडी : 140-150, कारली : हिरवी 300-320, पांढरी : 200-220, पापडी : 250-300, पडवळ : 200-220, फ्लॉवर : 80-100, कोबी : 50-70, वांगी : 100-200, डिंगरी : 150-200, नवलकोल : 80-120, ढोबळी मिरची : 200-220, तोंडली : कळी 250, जाड : 100-120, शेवगा : 250, गाजर : 80-120, वालवर : 250-300, बीट : 80-100, घेवडा : 550-600, कोहळा : 100-150, आर्वी : 200-250, घोसावळे : 160-180, ढेमसे : 150-200, भुईमूग : 300-350, पावटा : 500-550, मटार : परराज्य : 600-650, तांबडा भोपळा : 40-80, कैरी : तोतापुरी : 160-180, गावरान : 80-150, चिंच : (अखंड) : 300-320, फोडलेली : 600-650, सुरण : 230-250, मका कणीस : 50-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

पालेभाज्यांच्या भावात अल्पशी घसरण
भाव कडाडल्याने पालेभाज्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या भावात अल्पशी घसरण झाली आहे. कोथिंबिरीच्या भावात शेकडा जुडीमागे 200 रुपयांनी, तर मेथी, शेपू आणि करडईच्या भावात प्रत्येकी 100 रुपयांनी घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

कोथिंबिरीला 5 ते 13 रुपये भाव
रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची सव्वालाख जुडी, तर मेथीची 30 हजार जुडी आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात 5 ते 13 रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपये भावाने जुडीची विक्री होत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. उन्हाळ्यामुळे पुढील 15 दिवस पालेभाज्यांचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज भुजबळ यांनी वर्तविला आहे.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)
कोथिंबीर : 500-1300, मेथी : 500-1100, शेपू : 800-1200, कांदापात : 500-800, चाकवत : 500-600, करडई : 400-500, पुदिना : 200-300, अंबाडी : 500-600, मुळे : 1000-1600, राजगिरा : 400-600, चुका : 500-1000, चवळई : 300-600, पालक : 500-600.

मासळीच्या दरातील तेजी टिकून
गुजरात, कर्नाटक व मुंबईच्या किनारपट्टीवरून बाजारात मासळीची आवक वाढली आहे. आवक-जावक कायम असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत मासळीच्या दरातील तेजी टिकून आहे. बुधवारी (दि. 15) अधिकमास व त्यानंतर रमजानचे उपवास सुरू होणार असल्याने येत्या दोन दिवसांमध्ये मासळीला चांगली मागणी राहील. त्यानंतर मासळीच्या मागणीत व दरात थोडी घट होईल, अशी शक्यता व्यापारी ठाकूर परदेशी यांनी वर्तविली. दरम्यान, मागणी अभावी इंग्लिश अड्याच्या दरात शेकड्यामागे 17 रुपयांनी घट झाली आहे. मटण व चिकनचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.सुमारे 12 ते 14 टन आवक ः गणेश पेठेतील घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे 12 ते 14 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200-250 किलो आणि नदीतील मासळीची सुमारे दोन ते अडीच टना इतकी आवक झाली. तर, आंध्रप्रदेशातील रहु, कतला, सीलन आदी प्रकारच्या मासळीची सुमारे 14 ते 15 टन इतकी आवक झाली असल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

मासळीचे दर (प्रतिकिलो)
पापलेट : कापरी : 1500, मोठे : 1500, मध्यम : 1100, लहान : 750-850, भिला : 600, हलवा : 700, सुरमई : 700, रावस लहान : 650, मोठा : 850, घोळ : 600, करली : 360, करंदी ( सोललेली ) : 280, भिंग : 280, पाला : 600-1200, वाम : 360-600, ओले बोंबील : 120-200. कोळंबी : लहान : 320, मोठी : 480, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 900, लॉबस्टर : 1500, मोरी : 280-360, मांदेली : 140, राणीमासा : 200, खेकडे : 200, चिंबोर्या : 480. खाडीची मासळी : सौंदाळे : 240, खापी : 240, नगली : 400, तांबोशी : 440, पालू : 280, लेपा : 160-240, शेवटे : 240, बांगडा : 160-200, पेडवी : 60, बेळुंजी : 120, तिसर्या : 200, खुबे : 160, तारली : 120. नदीची मासळी : रहू : 140, कतला : 180, मरळ : 320-480, शिवडा : 200, चिलापी : 60, मांगूर : 150, खवली : 200, आम्ळी : 120, खेकडे : 200, वाम : 550. मटण : बोकडाचे : 460, बोल्हाईचे : 460, खिमा : 460, कलेजी : 480. चिकन : चिकन : 150, लेगपीस : 180, जिवंत कोंबडी : 120, बोनलेस : 250. अंडी : गावरान : शेकडा : 620, डझन : 84 प्रति नग : 7. इंग्लिश : शेकडा : 360 डझन : 48 प्रतिनग : 4.

बाजारात कलिंगड, पपईच्या आवक वाढली
येत्या गुरुवारपासून (दि. 17 मे) रमजानच्या उपवासास सुरुवात होत आहे. त्यामुळे बाजारात कलिंगड, पपईच्या आवकेत वाढ झाली आहे. आवकेबरोबर मागणीही वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दोन्ही फळांच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, पेरूच्या भावात घट झाली आहे. लिंबाचा घसरलेला दर्जा कायम असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत लिंबाचे भावही घसरले आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. रविवारी येथील फळबाजारात अननस 6 ट्रक, मोसंबी 45 टन, संत्री 4 टन, डाळिंब 30 ते 35 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबाची 6 ते 7 हजार गोणी, चिक्कू दोन हजार डाग, पेरू 100 क्रेट, कलिंगड 25 ते 30 टेम्पो, खरबूज 15 ते 20 टेम्पोची आवक झाल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

फळांचे भाव
लिंबे (प्रति गोणी) : 200-700, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : गावरान (3 डझन) : 220-350, (4 डझन) : 70-200, मद्रास (3 डझन) : 200-400, (4 डझन ) : 100-250, संत्रा : ( 3 डझन) 150-300, (4 डझन) : 60-200, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 30-120, गणेश 10-20, आरक्ता 10-35. कलिंगड : 5-15, खरबूज : 10-25, पपई : 5-20, चिक्कू : 100-600, पेरू (20 किलो) : 400-450.