दिल्ली :भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात ४-१ अशा फरकाने कसोटी मालिका पराभूत झाला. या मालिकेत शेवटच्या ३ सामन्यांसाठी ऋषभ पंत याला संधी देण्यात आली. पहिल्या दोन सामन्यात त्याला आपल्या फलंदाजीने फारशी छाप पाडता आली नाही. पण शेवटच्या सामन्यात त्याने शतकी खेळी करून आपल्या संघाला आधार दिला होता. याबाबत बोलताना निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी ऋषभ पंतला यष्टिरक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सूचक वक्तव्य केले.
ऋषभ पंत हा युवा खेळाडू आहे. त्याच्या फलंदाजीने साऱ्यांना प्रभावित केले आहे. मात्र त्याला चांगले यष्टिरक्षण करण्याची गरज आहे. २० वर्षांच्या ऋषभ याने ओव्हल कसोटीत शानदार शतक केले. मात्र यष्टींच्या मागे त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. त्यामुळे ऋषभला यष्टिरक्षणाचे धडे गिरवणे अधिक महत्वाचे आहे, असे प्रसाद म्हणाले.