नवी दिल्ली । एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकण्याचा विक्रम करणारा भारताचा युवा फलंदाज रोहित शर्माने जाहीर केलेल्या नवीन आव्हानामुळे जगभरातल्या गोलंदाजाची झोप उडाली असणार. रोहित शर्माने एका मुलाखतीत म्हटले आहे की, मी आता कोठे ही सामना खेळतो तेव्हा लोकांची अपेक्षा असते की मी 400 धावा कराव्यात.चाहते मला विचारतात की 300 धावा केव्हा करणार. हे बोलणे सोपे वाटते पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते कठीण आहे. भारतीय प्रेक्षकांचे प्रेम आणि अपेक्षा नेहमीच माझ्या आणि संघासोबत असतात आणि मी ही आशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 धावा करेल.
दोन्ही द्विशतके होती महत्त्वपूर्ण
रोहितने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत दोन दुहेरी शतके झळकावली आहेत. तो म्हणाला की, पहिले द्विशतक संघाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे होते. हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा 2013 मधील अंतिम सामना होता. हे द्विशतक माझासाठी महत्त्वपूर्ण होते. कारण मी संघाच्या विजयासाठी योगदान दिले होते. ज्यामुळे भारताने मालिका जिंकली होती. श्रीलंकाविरुद्धचे दुसरं दुहेरी शतकदेखील महत्त्वपूर्ण होते. कारण मी त्या डावात 33 चौकार ठोकले होते जे आश्चर्यकारक होते.
रोहित एकमेव फलंदाज
रोहित शर्मा हा जगातील एकमेव फलंदाज आहे, ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके ठोकली आहेत. 2013 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियात पहिले द्विशतक झळकावले. रोहितने 158 चेंडूत 20 चौकार आणि 16 षटकारांसह 208 धावा केल्या होत्या. 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने दुसरे शतक झळकावले. त्यामध्ये त्याने 173 चेंडूत 33 चौकार आणि 9 षटकारांसह 264 धावा केल्या. त्याचा आजपर्यंतचा हा विक्रम मोडला गेलेला नाही.