एफ.आर.पी. साठी खासदार राजू शेट्टींचे 1 जानेवारीपासून आंदोलन

0

संगमनेर : एफ.आर.पी थकवलेल्या साखर कारखानदारांविरोधात खा. राजू शेट्टींनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. 1 जानेवारीपासून या साखर कारखानदारांविरोधात आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये पहिला मोर्चा कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर संचालकांच्या कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचं खासदार राजू शेट्टींनी सांगितले आहे.

ऊस दार नियंत्रण १९६६ नुसार साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची एफ आर पी देणं बंधनकारक आहे असे राजू शेट्टी म्हणाले. साखरेला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे देता येत नसले, तर आधी सरकारचा कर आणि व्याजाचे हप्ते थांबवून शेतकऱ्यांचे पैसे साखर कारखानदारानी देण्याची मागणी शेट्टींनी केली आहे.