ऐन उन्हाळ्यात महावितरण करणार लोडशेडींग

0

मुंबई : सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. नागरिकांची वाढत्या उष्म्याने गैरसोय होत आहे. असे वातावरण असतांना ऐन उन्हाळ्यात महावितरण त्यांच्या ग्राहकांना भारनियमनाचा त्रास सहन करायला भाग पाडणार आहे. राज्यभरात गरजेनुसार सर्व ठिकाणी महावितरणकडून भारनियमन लागू केले जाणार आहे.

औष्णिक प्रकल्पाचे काही संच बंद असल्यामुळे महावितरणने हा निर्णय घेतला आहे. जवळपास 4100 मेगावॅट विजेचा तुटवडा आहे. कोराडी, परळी, चंद्रपूर, रतन इंडिया, तारापूर, मुंद्रा, अदानी पावर प्लांटमधून महावितरणला वीज उपलब्ध झाली नसल्याने भारनियमनाचा निर्णय महावितरणने घेतला आहे. महावितरणच्या या निर्णयाचा फटका थेट शेतकर्‍यांना बसणार आहे. कारण महावितरणकडून शेतीपंपांचा वीज पुरवठा थांबवून घरगुती ग्राहकांना वीज पुरवठा करणार आहे.