जळगाव । राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे राज्यस्तरीय जनजागृती अभियानांतर्गत नागपूर येथून सुरू झालेल्या 20 डिसेंबर 2017 ला रथयात्रेला सुरूवात झाला असून 7 डिसेंबर रोजी पारोळा येथे दाखल करण्यात आली. तर सोमवारी 8 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मागण्यांसह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, माजी जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, विजय पाटील, महानगराध्यक्ष निलेश पाटील, गफ्फार मलीक, जि.प. सदस्य रविंद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व विद्यार्थ्यांतर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय जनजागृती अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दीक्षाभूमी नागपूर मार्गे कोल्हापूर पुणे ते बारामती दरम्यान आयोजित केलेल्या 19 डिसेंबर ते 14 एप्रिल अविरत असे रथयात्रा दौरा 7 जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यात दाखल करण्यात आली.
या आहेत विविध मागण्या
मागासवर्गीय आयोगावार ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृत करावे, ओबीसीची जातनिहाय जनगणना जाहिर करून त्यांना नितीआयोगाकडून निधी वेगळी तरतूद करावी, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला 5 हजार कोटी भांडवल द्यावे, उद्योग व्यवसायासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज मर्यादार वाढवावी, क्रिमिलेअरची अट रद्द करावी, स्वामीनाथ समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करा, मंडल कमीशनची 100 टक्के अंमलबजावणी करा, शेतकर्यांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करा, शेतकर्यांच्या तरूण मुलांना उद्योगासाठी शुन्य व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून द्या, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण आहे. पण पुढे विधानसभा लोकसभेत ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, तीन वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रिशिप ताबडतोब अदा करावी, स्पर्धा परिक्षेत महिलांना नॉनक्रीमिलेअरची जाचक अटी रद्द करण्यात यावी.