धुळे । मुबई – आग्रा महामार्गावरील हॉटेल नालंदाजवळ लग्नाला जाणारे व्हॅनने ट्रकला मागून धडक दिली हा अपघात पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडला. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबादहून राजस्थानकडे लग्नासाठी व्हॅन जात होती. मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल नालंदाजवळील गतीरोधक असल्याने पहाटेच्या अंधारात ही बाब लक्षात न आल्यामुळे ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबला त्यामुळे मागून येणारी व्हॅन ट्रकवर जावून आदळली. या अपघातात सुशिला ताराचंद जोशी (40), वर्षा सुशिल जोशी (32) आणि रमेश जोशी यांना हे जखमी झाले. सुदैवाने 8 वर्षाची बालिका सुखरुप बचावली आहे. पहाटेच्यावेळी जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अंधाराचा फायदा घेत ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला.