कमलनाथ सरकारची कसोटी; तातडीची मंत्रिमंडळ बैठक

0

भोपाळ : ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. सोबतच २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सरकार मोठ्या संकटात सापडले. कॉंग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामे दिल्याने राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला मध्यरात्रीच बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठविले आहे. उद्या तातडीने बहुमत सादर करावे लागणार असल्याने कमलनाथ सरकारची कसोटी लागली आहे. दरम्यान मुख्यमंत्री कमलनाथांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. यानंतर ते आमदारांसोबत चर्चेसाठी हॉटेलवर जाणार आहेत.

काँग्रेसच्या 82 आमदारांना राजस्थानमध्ये हलविण्यात आले होते. त्यांना आज रविवारी पुन्हा भोपाळमध्ये आणण्यात आले असून मॅरियॉट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या हॉटेलला पोलिसांसह कार्यकर्त्यांनीही वेढा घातला आहे. गुरगावमध्ये मानेसरच्या एका रिसॉर्टमध्ये भाजपाचे आमदारांना ठेवण्यात आले असून रविवारी भोपाळला आणले जाऊ शकते. तर बंगळुरु येथील ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक आमदारांनाही उद्या विधानसभेचे कामकाज सुरु होण्याआधी भोपाळमध्ये आणण्यात येईल.