कर्जमाफीसाठी पाचवा दिवसही वाया

0

मुंबई:- राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी देखील कामकाज होऊ शकले नाही. विधानसभेत अवघ्या तीन मिनिटांत कामकाज गुंडाळले गेले. गदारोळ थांबत नसल्याने अध्यक्षांनी 12 वाजता पूर्ण दिवसासाठी सभागृह तहकूब केले. दरम्यान संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी धुलिवंदन तसेच मंगळवारी बैठक होत नसल्याचा प्रस्ताव ठेवला. यामुळे आता बुधवारी कामकाज होणार असून शेतकरी कर्जमाफीवरून अर्थसंकल्पाच्या आधी कामकाज सुरळीत होईल की नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज होऊ देणार नसल्याचे सर्वच पक्षांच्या आमदारांनी आजही अभूतपूर्व गोंधळ केला. या गोंधळामुळे सुरुवातीला दोन वेळेस सभागृह तहकूब करूनदेखील सदस्यांचा गोंधळ कमी होत नसल्याचे सभागृह संपूर्ण दिवसासाठी तहकूब करण्याचा निर्णय अध्यक्षांना घ्यावा लागला. दरम्यान आज शिवसेनेचे मंत्री देखील कर्जमाफीसाठी आंदोलनात सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.या मागणीसाठी दुपारी 12 पर्यंत सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आजही विरोधकांपेक्षा शिवसेना जास्त आक्रमक दिसून आली. सभागृहाबाहेर सेनेच्या आमदारांनी भाजपा विरोधी घोषणाबाजी देखील केली तर भाजपा आमदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसविरोधी घोषणाबाजी केली.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]ताज्या बातम्यांसाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज[edsanimate_end]

विधानसभा सभागृहात आज, शुक्रवारी सकाळी 11 वाजेपासूनच शेतकाऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधकांसह सेनेचे मंत्री पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसून आले. आजही शिवसेनेच्या आमदारांनी फलक लावून कर्जमाफीची मागणी केली तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आज सुरुवातीपासूनच भाजपाचे देखील सर्व आमदार कर्जमाफीसाठी आखाड्यात उतरले. यावेळी भाजपाचे आमदार अध्यक्षांच्या आसनासमोर उभा राहून घोषणाबाजी करत होते. कालप्रमाणेच आज देखील सर्वच पक्षांच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनाला अक्षरशा घेराव घातला होता. यावेळी मंत्री मात्र दुरून गोंधळ पाहत होते. गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने अध्यक्षांना कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.

सर्वपक्षीयांची जोरदार घोषणाबाजी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांसह सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या आमदारांनी देखील सभागृहात आणि सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शिवसेनेचा एकच नारा, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा अशा घोषणा शिवसेना आमदारांनी केल्या. आधी शिवसेना आमदारांनी घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडलं. कालच्या घोषणांचा प्रवाह आज आणखी जोरात दिसून आला. विरोधी पक्षांच्या आमदारांसोबत सत्तेतील शिवसेना आणि भाजपचे आमदार घोषणाबाजी करतानाचे अफलातून चित्र आजही पाहायला मिळाले.