कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे-राहुल गांधी

0

नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. आतापर्यंत मोदींनी शेतकऱ्यांचे एक रुपयाचे कर्जही माफ केलेले नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी जोपर्यंत देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत पंतप्रधान मोदींना झोपू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काल काँग्रेसने सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर अवघ्या काही तासातच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अवघ्या काही तासांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. यावरुन राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. ‘काल काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा निर्णय घ्यायला त्यांना सहा तासदेखील लागले नाहीत. मात्र मोदी साडेचार वर्षांपासून पंतप्रधान आहेत. त्यांनी या काळात शेतकऱ्यांचे एक रुपयाचंही कर्ज माफ केलेले नाही,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.