कर्जमाफी केल्यास अर्थव्यवस्थेला फटका

0

मुंबई । शेतकर्‍यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. अशात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनीही कर्जमाफी केल्यास देशाच्या अर्थ व्यवस्थेवर विपरित परिणाम होतील, असे वक्तव्य केले आहे. तर तिकडे मध्यप्रदेशातील शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर उर्जित पटेल यांनी हे वक्तव्य केले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसेल. शिवाय कर्जमाफीमुळे मागील दोन वर्षात वित्तीय तूट कमी करण्यासाठी जे प्रयत्न केले, ते वाया जातील. तसेच कर्जमाफीचा निर्णय विचारपूर्वक करावा, असेही उर्जित पटेल म्हणाले.

भाजपचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशात शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली आहे. तर महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना 31 ऑक्टोबर देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारही नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आले आहेत. मात्र अजूनही राज्यातील शेतकर्‍यांच्या मागण्या सरकारने पूर्णपणे मान्य केल्या नाहीत. कर्जमाफीसाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांचं आंदोलन सुरु आहे. मात्र मध्य प्रदेशातील आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतकर्‍यांचा मृत्यू झाला