काश्मिरी मुसलमानांनी जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केले, म्हणूनच हिंदूंचा नरसंहार करणे सोपे झाले ! – डॉ. क्षमा कौल,


     काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य शेवटी समाजाला मान्य करावेच लागले. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे हे शक्य झालेवर्ष 1990 च्या भयानक काळरात्रीनंतर तत्कालीन सरकार काश्मिरी हिंदूंसाठी काही करेलअसे वाटत होतेमात्र तसे काही घडले नाही आणि काश्मिरी हिंदूंसह महिलांवर होणारे अत्याचार चालूच राहिलेकाश्मीरमधील मुसलमान पुरुषांसह मुसलमान महिलांनीही जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केलेम्हणूनच जिहाद्यांना काश्मिरी हिंदूंचा नरसंहार करणे सोपे झालेअसे धक्कादायक वास्तव जम्मू येथील साहित्यिक डॉक्षमा कौल यांनी मांडलेत्या हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘द कश्मीर फाइल्स’– हिंदू महिलांच्या मनावरील घाव !’ या ऑनलाईन विशेष संवादात बोलत होत्या.


     या वेळी ‘द न्यू इंडियन’च्या संस्थापकसंपादक आरती टिक्कू म्हणाल्या की, 1990 च्या दशकात झालेले काश्मिरी हिंदूंच्या सामूहिक हत्याकांडाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहेकाश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य कोणी लपविले आणि ते पुढे येऊ दिले नाहीयाचा शोध घेण्याची गरज आहेयाला सर्वपक्षीय राज्यकर्ते उत्तरदायी आहेतवर्ष 1990 च्या काळात काश्मिरी हिंदू महिलांवर बलात्कार झालेत्यांच्या हत्या करण्यात आल्याहिंदूंनी स्वतःची ओळख विसरावीअशा प्रकारे दहशत निर्माण करण्यात आलीइस्लामी आतंकवाद आणि काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाचे वास्तव समोर येता कामा नये आणि सामूहिक आतंकवादाचा कारखाना असाच चालू राहावाअशी इच्छा इस्लामी आतंकवादामुळे ज्यांचा फायदा होताते बाळगून होते.

      ‘पनून कश्मीर’च्या प्राशैलजा भारद्वाज म्हणाल्या कीकाश्मिरी मुसलमान समाजाने कट्टर आतंकवाद्यांना आमंत्रण दिल्याने आणि त्यांना साहाय्य केल्याने वर्ष 1990 चा काश्मिरी हिंदूंचा नरसंहार करण्यात आलायाच वेळी ‘आझाद कश्मीर’च्या नावाखाली दिलेल्या घोषणांमध्ये आतंकवादी, ‘जे.के.एल्.एफ्.’ सारख्या उग्रवादी संघटना यांच्यासमवेत मुसलमान नागरिक सुद्धा सहभागी झाले होतेभारताच्या सैन्यदलाने त्या वेळी हस्तक्षेप केला नसतातर काश्मीर भारतापासून वेगळा झाला असताअजूनही भारताच्या सैन्यदलामुळेच काश्मीरवर भारताचे नियंत्रण आहे.