कासमवाडीतील महिलेचा विनयभंग ; चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : शहरातील एका भागात राहणारी महिलेस शिवीगाळ करीत मारहाण करून विनयभंग केल्याची घटना बुधवार, 29 डिसेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर शिविगाळ, विनयभंग
शहरातील एका भागात 48 वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार, 29 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महिलेच्या मुलाला घरासमोरील राहणारा मुलगा भैरव राणे हा ओढताण करीत असल्याचे पाहून महिला सोडविण्यासाठी गेली. त्यावेळी भैरव राणे याने महिलेला अश्लिल शिवीगाळ करून विनयभंग केला तर प्रमिला भगवान राणे, उज्जवला प्रदीप राणे आणि प्रदीप पाटील यानीं महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी महिलेने चौघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सुनील सोनार करीत आहे.