नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीमुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. भाजप-कॉंग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. कॉंग्रेसवर सातत्याने देशभक्तीच्या मुद्द्यावरून आरोप केले जातात. यावरून कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काही लोक देशभक्तीची नवी व्याख्या आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा टोला सोनिया गांधींनी मोदी यांचे नाव न घेता लगावला. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या देशात सुरुवातीपासूनच विविधता आहे, तरीही हा देश एक आहे. मात्र आता हे वैविध्य न स्वीकारणाऱ्यांना देशभक्त म्हटले जाते आहे. आम्ही काय खावं? काय कपडे घालावेत? हेदेखील आम्हाला शिकवले जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते आहे. लोकांची मनमानी आम्ही सहन करावी अशी अपेक्षा ठेवली जाते आहे असंही सोनिया गांधी यांनी सांगितले आहे.
देशात गोमांसाच्या मुद्द्यावरूनही हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. याकडेही सोनिया गांधी यांनी लक्ष वेधले. आम्ही काय खायचे प्यायचे? कपडे कसे परिधान करायचे हेदेखील आता काही ठराविक लोक ठरवणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते आहे असेही त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे. आम्ही ठराविक वर्गाची मनमानी का सहन करायची असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.