श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला मोठं यश आलं आहे. कुलगामच्या चौगाम येथे आज झालेल्या चकमकीत ५ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. ही चकमक सुरू असतानाच कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने बारामुल्ला आणि काजीगुंड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या ४८ तासात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत १३ जण ठार झाले आहेत.
चौगाम येथे सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवानही जखमी झाले आहेत. घटनास्थळावरू आतापर्यंत तीन अतिरेक्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. चकमकीनंतर या संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून शोध मोहीम सुरू आहे. पहाटेपासूनच चकमक सुरू झाल्याने बारामुल्लातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याने बारामुल्ला आणि कांजीगुंड एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.