कुलभूषण जाधवची ससेहोलपट

0

कुलभूषण जाधव एक भारतीय सैनिक पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये खितपत पडला आहे. अनपेक्षितपणे पाकिस्तानने त्यांच्या कुटुबियांना त्यांना भेटण्यास परवानगी दिली. त्यांची पत्नी आणि मातोश्री त्यांच्या भेटीसाठी गेले. पाकमध्ये त्यांना अपमानित केले. हे पण अपेक्षित होते. भेट देण्यापाठी पाकचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या बाजूने लोकमत निर्माण करायचे होते. पण पाकमधील जनमत भारताविरुद्ध निर्माण करण्याचे ही होते. पाकच्या जनतेचा प्रचंड रोष सरकारविरुद्ध आहे. म्हणूनच जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पाक सरकार व सैन्य नेहमीच भारत द्वेष वापरत आले आहे.

जसे भारत सरकार पण पाक द्वेष वापरून हिंदू-मुस्लिम द्वेष पेटवत राहते. त्यापाठीमागे देशाची लूटमार करत राहते. जनता स्वामिनाथन आयोग विसरून जाते. शेतकर्‍याला योग्य भाव देण्याचे मोदींचे फोकनाड दुर्लक्षित करते. कुलभूषण जाधवचा पण उपयोग पाकिस्तान द्वेष वाढवण्यासाठी करण्यात येत आहे. त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी पाकला शिव्या देण्यात सरकार जास्त रस घेते. कुलभूषणला वाचवायचे असेल तर आता पाकला शिव्या देवून ते निश्‍चित होणार नाही. भारतीय जनतेला पाकविरुद्ध पेटवून हे कसे होणार? त्याऐवजी पाकला बदल्यात काही तरी द्यावे लागणार आहे. जेणेकरून पाक कुलभूषणला भारतात परत पाठवेल. आंतरराष्ट्रीय संबंधात लेण-देणने असे प्रश्‍न सोडवले जातात. मला विश्‍वास आहे कि भारत सरकार कुलभूषणला परत आणु शकते. पण ते न करता पाक द्वेष पेटवण्यासाठी कुलभूषणचा वापर होणार का? राजकारणात सैनिकांचा नेहमीच बळी देण्यात येतो. असे होऊ नये ही अपेक्षा आहे. सध्या सर्वांनी फक्त कुलभूषणला परत आणण्यावर भर दिला पाहजे.

शेवटी शिव्या देवून काहींच फायदा होत नाही. त्याचा फायदा सर्वात जास्त अमेरिकेला होतो. कारण भारत आणि पाक सर्वात मोठे अमेरिकन हत्याराचे खरीददार आहेत. आतातर मनमोहन सिंघ आणि मोदिनी भारताचे हत्यार उत्पादन संपवून परदेशी हत्यारे घेण्यावर भारताला परावलंबी करून टाकले आहे. अमेरिका तर नेहमीच पाकबरोबर राहिली आहे. तरी आम्ही अमेरिकेचेच पाय धरतो. सर्वात वाईट अनुभव मला कारगिल युद्धात आला. पाक सैन्य उंच डोंगरावर मोर्चे बांधून बसले होते. प्रचंड पैसा गिळणारे गुप्तहेर खाते पूर्ण अपयशी झाले होते. वाजपेयी नवाज शरीफला मिठ्या मारत लाहोरेला भारत-पाक संबंध सुधारत होते. आणि येथे भारतीय सैन्य गन्घोर युद्धात लडत होते. भारतीय सैन्याला ह्यांची घाण धुवून काढण्यासाठी लढावे लागले. उंच टेकड्यांवर हल्ले करावे लागले. सैन्याने मागणी केली कि अशी लढाई लढलो तर प्रचंड सैनिकांची जीवितहानी होईल. त्यापेक्षा LOC पार करून पाकवर पाठून हल्ला करायला द्या. सात दिवसात लढाई जिंकू. पण नागनाथ भाजपने परवानगी दिली नाही. कारण अमेरिकेने आदेश दिले होते कि पाकवर हल्ला करायचा नाही. म्हणजे काँग्रेस सापनाथ आणि भाजप नागनाथ हे अमेरिकन आदेशावर देश चालवतात. हिच 1991 नंतरची शोकांतिका आहे. अनेक भारतीय सैनिक मारले गेले त्याची किंमत कोण मोजणार? 1991 नंतरचा काळ हा अशाच गोर्‍यांच्या गुलामीत गेला आहे. म्हणूनच ह्यांना बुलेट ट्रेन पाहिजे आणि त्या बदल्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या चालू आहे. कर्जबाजारी अंबानीला राफेल विमानाची दलाली करायला मोदि मदत करतात. सरकारी कंपनी क-ङ ला बाजूला काढून अनिल अंबानीला राफेल उत्पादक दासाल्ट/ Dassault कंपनीचे भागीदार मोदी करतात. संरक्षणमंत्री परीकरला देखील विचारत नाहीत. त्यांचा विरोध मोडून काढतात. त्यांना पुन्हा गोव्याला पाठवतात. नागपूरला प्रचंड जमीन विमान आणि सुटे भाग बनवण्यासाठी अंबानीला देतात आणि भारतीय सुरक्षेला प्रचंड धोका निर्माण करतात. 21000 कोटी रुपये कर्जबाजारी अंबानीला मिळतात. हे सापनाथ णझ- आणि नागनाथ ND– चे धंदे आहेत. सर्जिकल स्ट्राईक करायचे आणि मोदींना धनुष्यबाणधारी रामाच्या रुपात प्रदर्शित करायाचे. जणू काय मोदीच लडतात. इकडे पाक ने 40 स्ट्राईक करून आमचे सैनिक मारले. गेल्या अनेक वर्षात 8000 भारतीय सैनिक मारले गेले. चीन युद्धात ह्याच्या अर्धे सुद्धा सैनिक मारले गेले नाहीत. म्हणूनच मी 2014 च्या निवडणुकीपूर्वी लिहले होते कि मोदी गरजणार पण बरसणार नाही. पाकविरुध काँग्रेस प्रमाणेच काही करणार नाही. कारण आपण अमेरिकेच्या हुकमाची तामिल करणार. भारताचे हीत बघणार नाही आणि तसेच होतय. एवढे सैनिक ह्या तुमच्या लुटूपुटूच्या लढाईत मारण्यापेक्षा; एकदाची निर्णायक लढाई करून पाकचे 4 तुकडे केले पाहिजेत. पण पाकला एकसंघ ठेवण्यासाठी अमेरिका कटीबद्ध आहे. हा मोदींच्या वल्गनांचा सर्वात मोठा पराभव आहे. मोदींना सांगा कि फेकुपणा करण्यापेक्षा पाकला संपवून दाखवा तरच आपण सुरक्षित होऊ. कुलभूषण जाधव हे सांगली जिल्ह्यात जन्माला आले. वडील पोलीस अधिकारी होते. ते ND- मध्ये प्रशिक्षित झाले अन 1991 ला नौदलात अधिकारी झाले. पाकच्या म्हणण्याप्रमाणे 2003 मध्ये गुप्तहेर खात्यात R-W मध्ये काम करू लागले. त्याने इराणमध्ये छाबर येथे छोटा धंदा सुरु केला. पाकचा आरोप आहे कि तेथून त्याने पाकमध्ये घुसखोरी सुरु केली. पाक सरकार म्हणते कि, 3 मार्च 2016 ला बलुचिस्तान येथील चमन जवळ त्यांना अटक करण्यात आले. पाक म्हणते कि जाधव अजून नौदलात आहे. तो R-W ह्या भारतीय गुप्तहेर खात्याचा गुप्तहेर आहे. त्याने नवीन नाव हुसेन मुबारक पटेल धारण केले व इराणमध्ये आला. बलूचिस्थान मधील पाकविरुद्ध दहशतवाद्यांना मदत करत होता.

– ब्रिगेडिअर सुधीर सावंत
9987714929