केंद्र सरकारचे शालेय शैक्षणिक धोरण स्वागतार्ह

0

कर्जत (कांता हाबळे) – सध्यस्थितीत इयत्ता पहिली ते अठवीच्या विद्यार्थ्यांना राई टू एज्युकेशन कायद्यांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करावे लागत आहे. दरवर्षी आठवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना कमी गुण पडले अथवा ते परिक्षेला गैरहजर राहिले तरी सुध्दा पुढच्या वर्गात पास होऊन जात होते. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार त्यावेळी राज्यशासनाने तशी अंमलबजावणी केली होती. त्यामूळे विद्यार्थ्यांची क्षमता असो किंवा नसो तरी पास करावे लागत होते. त्यामूळे या विद्यार्थ्यांच्या बुध्याकांचे मुल्यमापन होत नव्हते. त्यांचा आजच्या स्पर्धेच्या युगात कसा टिकाव लागणार अशी चिंता पालकांना भेडसावत होती. त्यासाठी राईट टु एज्युकेशन कायद्यात कुठेतरी बदल होणे अपेक्षित होते. नुकताच केंद्र सरकारने पाचवी व आठवीच्या शाळकरी मुलांना उत्तीर्ण होण्याएवढे मार्क न पडल्यास नापास करण्याचा जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रीया पालक वर्गातून उमटत आहे.

पुर्वी प्रमाणेच मुल्यमापन करण्याचा निर्णय
पूर्वी शाळेतील मुले नापास झाल्यावर विशेष करुन ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांचा कल शाळा सोडण्याकडे असायचा. यामूळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण लक्षणीय होते. राईट टु एज्युकेशन कायद्यांतर्गत 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना म्हणजेच पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाबाबत त्यावेळेसही पालक तसेच शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांमधून संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या होत्या. त्यामूळेच अखेर केंद्र सरकारने त्यावेळी घेतलेला निर्णय बदलून पुर्वी प्रमाणेच किमान 5 व 8 वीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करुन नापास करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरसकट मुलांना पास केल्यामूळे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची मानसिकता नव्हती. पाचवी व आठवीला नापास करण्यामूळे अभ्यास करण्याची मानसिकता वाढेल. विद्यार्थ्यांवर अन्याय न होता परिक्षेची दुसरी संधी देणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल.
शिक्षक : ज्ञानेश्वर वाडिले (कडाव, कर्जत)

यापूर्वी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केल्यामूळे काही विद्यार्थ्यांकडून या काळात योग्य अध्ययन केले जात होते. परिणामी नववीत गेल्यावर सदर विद्यार्थी नापास होण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. यापूढे या बदलत्या निर्णयामूळे नववीचा निकाल चांगला लागण्याची शक्यता आहे.
शिक्षक : राजेंद्र बोराडे (भिसेगाव)

राईट टु एज्युकेशन कायदयाअंतर्गत आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना पास केल्यामूळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता नसतानाही शैक्षणिक पात्रता नसतानाही पास करावे लागत होते. या बाबींला अडचण निर्माण होत आहे.

शिक्षक : श्रीकृष्ण लोहारे (चिंचवाडी)

शिक्षक: रोहू गवळी (तिवणे)
आठवीच्या पर्यंत सर्वांना पास करण्यामूळे राईट टु एज्युकेशन कायदयात सुधारणा करणे गरजेचे आहे.

शिक्षक : रमेश आहिरे (नसरापूर )
विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत पास केल्यामूळे विद्यार्थी आळशी बनले होते. भविष्यात स्पर्धात्मक युगाला ते हानीकारक होते.