रावेर : तालुक्यातील केर्हाळा बु.॥ येथील 50 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. बलराम बारेला (50, मूळ रा.झिरन्या, जि.खरगोन ,ह.मु.केर्हाळा) असे मयताचे नाव आहे. संजय चौधरी यांच्या वाड्यामध्ये राहणार्या बारेला यांनी गुरुवारी सकाळी पत्री शेडच्या अँगलला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. संजय चौधरी यांच्या खबरीवरुन रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही.