केवळ 6 विमानतळांवरच बॉम्ब निष्क्रीय होवू शकतो

0

नवी दिल्ली । भारतावर सतत धहशतवादी कारवायांचे सावट असूनही एक धक्कादाय माहिती उजेडात आली आहे. देशातील 59 मुख्य विमानतळांपैकी केवळ 6 विमानतळांवरच सीआयएसएफची टीम बॉम्ब निष्क्रीय करू शकते. म्हणजे केवळ दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, कोचिन आणि हैदराबाद या सहा ठिकाणीच बॉम्ब निष्क्रीय करण्याची सुविधा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आवश्यक यंत्रणांचा अभाव असल्याची माहिती
त्यामुळे भारतात आजही दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम आहे, जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान केलेल्या पाहणीमध्ये याबाबतची माहिती समोर आली आहे. सहा विमानतळांपैकी फक्त कोलकाता आणि चेन्नई विमानतळ हे एअरपोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाद्वारे चालवले जातात, इतर विमानतळ खासगी आहेत. ब्यूरो फॉर सिविल एविएशन सिक्युरिटी च्या नियमांनुसार, विमानतळावर जवळपास 28 वस्तूंचा वापर बॉम्ब निष्क्रीय करण्यासाठी केला जातो. पण या सर्व आवश्यक वस्तू केवळ 6 विमानतळावरच उपलब्ध असल्याची माहिती आहे.

सरकारला पाठवले पत्र
सीआयएसएफच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, 28 वस्तूंपैकी एकही वस्तू नसेल तर बॉम्ब निष्क्रीय करता येत नाही. याबाबत सिव्हील एविएशन मंत्रालयाला पत्र पाठवून माहिती देण्यात आली आहे असे या अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे आता भारतीय विमानतळांच्या सुरक्षायंत्रणेवर संशयाचे बोट दाखवण्यात येत आहे. भारतातील कोणत्याही विमानतळांवर कदिही दहशतवादी हल्ला होवू शकतो. तेथे बॉम्ब निष्क्रीय करणार्‍या यंत्रणेची तातडीने उपलब्धता करून देण्याची आवश्यकता आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्‍न आहे, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र भआरत सरकार या बाबीकडे किती गंभीरपणे पाहते हे महत्वाचे आहे.