नवी दिल्ली- देशभर कोरोनाचा कहर वाढत आहे. अश्या वेळी सगळ्यांनाच लस घ्यायची आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी मे पासून देशात १८ वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार असल्याची घोषणा केली होती.ज्याची नोंदणी करणे बंधनकारक आहे.आणि हीच नोंदणी करण्याची वेबसाईट सध्या बंद आहे.या वेबसाईटचे सर्वर डाऊन झाले आहे. ज्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्रात लसीकरण नाहीच
महाराष्ट्राला लस लगेच उपलब्ध होणार नाहीये, म्हणून १ मेपासून लगेचच लसीकरण सुरु होणार नाही, १८ – ४४ वयोगटातील लोकांना विनंती आहे की त्यांनी सबुरीनं घ्यावं लागेल. अश्या शब्दात महाराष्ट्रात एक मे पासून लसीकरण होणार नाही असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घोषित केले. मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर ते बोलत होते. केंद्र सरकारने येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे करोना लसीकरण करण्याचे सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा खोळंबा झाला आहे.