मुंबई: चीनमधील कोरोना विषाणूचा आता जगभर पसार झाला असून, अनेक देशातील नागरिकांना कोरोना विषाणूची लाआग्न झाली आहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा, सामने, रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूची १७ रुग्णांना ालागण झाली आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक कार्यक्रम यामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी केला आहे. कोरोना विषाणूचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेवर परिणाम झाला असून १०० वे नाट्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ कांबळी यांनी या विषयी एक पत्रक प्रसिद्ध करून याबद्दल माहिती दिली. फक्त मराठी सिनेसृष्टीवरच नाही तर बॉलिवूड आणि हॉलिवूडवरही याचा परिणाम स्पष्ट दिसून येत आहे.