जळगाव । प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून कानळदा येथील तरुणाचे अपहरण करून त्याला पैशांसाठी मारहाण केल्याप्रकरणी डिसेंबर महिन्यात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी 5 संशयीताना अटक करण्यात आली होती. सध्या ते जामीनावर आहेत. यानंतर या प्रकरणातील संशयित हरिष बाळू सपकाळे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाखल केला होता तो फेटाळण्यात आला होता. आज अखेर हरिष याला जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली आहे.
डिबी पथकाकडून अटक
कानळदा येथील नीलेश विष्णू भंगाळे (वय 29) याचे प्लॉट खरेदी- विक्रीच्या व्यवहारातून 11 डिसेंबर रोजी अपहरण केले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हापेठ पोलिसांनी या प्रकरणी शरद माधव सपकाळे , सतीश विलास तायडे, प्रवीण प्रेमराज शिरसाळे , प्रवीण धनराज तायडे , सागर भीमराव सोनवणे यांना अटक केली होती. ते सध्या जामीनावर आहेत. तर या प्रकरणातील फरार असलेल्या हरीश बाळू सपकाळे (रा. जाकीर हुसेन कॉलनी) याने अटकपुर्व जामिनासाठी न्या. दरेकर यांच्या न्यायालयात दाखल केले होता. तो न्या. दरेकर यांनी फेटाळून लावला होता. यानंतर जिल्हा पेठ पोलिस हरिष याचा शोध घेत होती. अखेर संशयितांची माहिती मिळताच आज सोमवारी जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे डिबी कर्मचारी राजेंद्र मेढे, अल्ताफ पठाण, नाना तायडे, अजीत पाटील, रवि नरवाडे यांनी संशयित हरिष सपकाळे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.