खड्यांला लोकप्रतिनिधींची नाव देऊन सुरू केले ‘सेल्फी पॉईंट’

जळगाव – जळगाव – अहिंसा परमो धर्म हि भारतीय संस्कुतीची शिकवण आहे. एकद्यावर शारीरिक हल्ला करण्यापेक्षा त्याच्या अंतरमनावर हल्ला केला पाहिजे असे खुद्द महात्मा गांधी यांनी सांगितले आहे. याचाच प्रत्यय शुक्रवारी जळगावकरांना आला.खड्यांमुळे त्रस्त असलेल्या दादावाडी परिसरातील नागरिकांनी खड्यांला लोकप्रतिनिधींची नाव देऊन ‘सेल्फी पॉईंट’ बनवला आहे.

दादावाडी परिसरात फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी खड्डे खणले जातात. ते न बुजवता असेच सोडून दिले जातात. त्यामुळे परिसरातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहेत. नागरिकांनी झालेल्या खड्डयांची दुरुस्तीसाठी प्रभागातील नगरसेवकांना कित्येकदा निवेदन देऊनहि खड्ड्याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. यामुळे गेल्या दोन महिन्यात या न बुझावलेल्या खड्ड्यात जवळपास १५ ते २० मोठ्या गाड्या अडकल्या आहेत. याच बरोबर रात्रीच्या वेळी ३० ते ४० नागरिक पडल्याने त्यांना दुखापत झाली आहे

अँड कुणाल पवार यांच्या संकल्पनेतून त्या खड्याला आमदार, खासदार, नगरसेवक यांची नावे देऊन सेल्फी पॉईंट सुरू करण्यात आला. त्या खड्यात कुंदन सूर्यवंशी, राहुल पाटील, सचिन नांनवरे, नितीन जाधव, सागर पाटील, पवन पवार व जेष्ठ मंडळींनी सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.
कुंदन सूर्यवंशी यांनी परिसरातील नागरिकांना फोटो काढण्याचे आवाहन केले आहे. फोटो स्पर्धा देखील आयोजित केली आहे. ज्याचा खड्डया सोबत उत्कृष्ट फोटो येईल त्यांना योग्य ते बक्षीस देखील देण्यात येणार आहे.