सरकार गोंधळल्यामुळे मुख्यमंत्री सुट्टीवर: आ. नितेश राणे

0

पुणे: भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडी सरकार सद्ध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुट्टीवर गेले असल्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे. कॅबिनेटमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतात. शिवसनेचे मंत्री हे टेबलवरील पेन आणि फाईल उचण्याचे काम करत असून, कॅबिनेटमध्ये कारकून सारखे बसलेले असतात, असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

मावळमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. नितेश राणे म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थकवलं असल्याने ते सुट्टीवर गेले आहेत, असा टोला नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पण त्यांनी कधी सुट्टी घेतली, की नागपूरला सुट्टीवर गेले असं ऐकलं का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या सहा वर्षांपासून सेवा करत आहेत. मात्र ते गुजरातला आईकडे सुट्टीवर गेले असं ऐकलं का? हे मुख्यमंत्री ६० दिवसातच थकले आहेत.

काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हैराण केले आहे. त्यामुळे थेट महाबळेश्वरला गेले आहेत. शिवसेनेचे सरकार कुठे आहे? शिवसेनेचे मंत्री, नेते हे कारकूनासारखे कॅबिनेटमध्ये असतात. निर्णय घेणारे हे सर्व काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आहेत. बाकी, टेबलवरील पेन आणि फाईल उचलण्याचे काम शिवसेनेचे मंत्री करतात, असा टोमणा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला मारला.