अमळनेर । विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांनी माझ्या मंजूर लोकार्पण झालेल्या तालूक्यातील ग्रामपंचायत इमारतीच्या कामांची आता मंजूरी मिळाल्याचे सांगून स्वतःचे हसू करून घेतले असून लोकप्रतिनिधी किती जागृत असतात हे दाखविण्याचा खोटा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे. श्रेयासाठी जनतेची दिशाभूल करणे त्यांनी थांबवावे, असे आवाहन आमदार शिरिष चौधरी यांनी त्यांचे निवासस्थानी आयोजीत पत्रकार परिषदेत केले. त्यांनी ज्या दिवशी हे माझे ते तूझे हे थांबवून हे आपले आहे, असे सांगतील त्यावेळी त्यांचा आम्ही सत्कार करू, असेही आमदार चौधरी यांनी सांगितले.
कामे केल्याची परस्पर शेखी मिरवू नका…
तालूक्यातील 7 ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामासाठी प्रत्येकी 12 लाख रूपये स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेतून मंजूर केली. त्यात सूंदरपट्टी, कळंबू, एकरूखी, खेडी प्र.ज., कूर्हे बू, अंचलवाडी व गलवाडे या 7 गावांचा समावेश आहे. मूळात 1 वर्षापूर्वीच या कामांना मंजूरी मिळून 5 गावातील ग्रा.प.इमारतीचे बांधकाम होवून लोकार्पण ही झाले आहे. मग आता पुन्हा हि कामे कूठून आणली? व मंजूर केल्याचा कांगावा केला जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचे नाव मा.बाळासाहेब ठाकरे मातोश्री योजना आहे. लोकप्रतिनिधींना हेडचे नाव माहित नाही आणी मंजूर दाखविली जाते फाफोरे बंधारा असो कि भिलाली बंधारेची सूधारीत प्र.मा. मंजूरी असो अशी अनेक मी मंजूर केलेली कामांचे श्रेय आमदार वाघ यांनी घेवू नये. मूळात खर्च करण्यासाठी फक्त 2 कोटी रूपये वर्षाला निधी मिळतो व वाघ मीच कामे केली अशी शेखी मिरवितात एकदा जनता दरबार भरवून याचा सोक्षमोक्ष लावण्यास तयार असल्याचे आ.शिरिष चौधरी म्हणाले.
वाघ यांनी दिलेला शब्द पाळावा
बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामे देणेबाबत उदय वाघ यांनी आमदार एकनाथराव खडसे, ना.गिरिष महाजन व मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस या पक्षाच्या जेष्ठ नेत्यांसमोर दिलेला शब्द त्यांनी पाळावा व पदमूक्त व्हावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. बाजार समितीवर सत्ता स्थापनेवेळी दोन्ही गट एकत्र आले होते त्यात दोन वर्ष वाघ यांचे कडे व 3 वर्ष आ.शिरिष चौधरी गटाला देण्याचे ठरले होते सेना प्रवेशाच्या चर्चेबाबत त्यांनी पत्रकारांना सांगीतले कि वेळ आल्यास जनता जनार्दन सांगेल तो आपण निर्णय घेवू असे सांगीतले.