चंद्रकांत पाटलांवर पुणेकरांचा संताप !

0

पुणे : पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विष्कळीत झाले आहे. १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील पुणे दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना नागरिकांचा तीव्र संतापाचा सामना करावा लागला. पुण्यातील संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घातला. कार्यकर्त्यानी साखळी करून त्यांना नागरिकांच्या गर्दीतून बाहेर काढले. त्यामुळे त्यांनी दौऱ्यातून काढता पाय घेतला.

मदत न देता फक्त फोटो काढायला आल्याचा आरोप पुरग्रस्त नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला. तसेच भाजप सरकार , पुणे महापालिका आणि पालकमंत्र्यांचा निषेध नोंदवणाऱ्या घोषणा देखील देण्यात आल्या. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र ,नागरिकांनी कुठलाही प्रतिसाद न देता त्यांना विरोध केला. या पुरात घर , वाहने यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांचे संसार उद्धवस्त झाले, अनेकांना कुटुंबातील व्यक्तींना गमवावे लागले. उपनगरातील सहकारनगर, सिंहगड रोड, वारजे, पार्वती ते दहा फूट पाणी वाहत होते. यामध्ये ओढ्यासह अनेक सोसायट्यांच्या संरक्षक भिंती कोसळल्याने शेकडो वाहने वाहून गेले. या पुरात घर , वाहने यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांचे संसार उद्धवस्त झाले, अनेकांना कुटुंबातील व्यक्तींना गमवावे लागले.

शहरातील अरण्येश्वर , सहकारनगर, पर्वती, धायरी, वडगाव यांसारख्या भागात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.या दुर्घटनेत शहरात १४ बळी गेले असून काही जण बेपत्ता आहेत.गेल्या २ दिवसांपासून येथील नागरिक आपतकालीन संकटांशी संघर्ष करत आहे. पण पुणे महापालिकेच्या प्रशासनाकडून अपेक्षित मदत येथील पूरग्रस्त कुटुंबाना मिळालेली नाही.