मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नेहमी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा तो वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे. त्याने एका चाहत्याच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना त्याला देश सोडण्याचा सल्ला दिला होता. त्याचे हे विधान क्रिकेट चाहत्यांना खूप नाराज करणारे आहे. चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावरून चांगलेच धारेवर धरले. भारतीय क्रिकेय नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) कोहलीचे कान टोचले. भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, पैसे कमावतोस, हे विसरू नकोस असे बीसीसीआयने कोहलीला सुनावले.
कोहलीची ही प्रतिक्रिया बीसीसीआयलाही आवडलेली नाही. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,” ते उत्तर म्हणजे मुर्खपणाच म्हणावे लागेल. त्याने असे विधान करण्यापूर्वी विचार करायला हवा. भारतीय चाहते गुंतवणूक करतात म्हणून कोहलीला पगार मिळतो, पैसे कमावतो, हे त्याने लक्षात ठेवायला हवे.”