मुक्ताईनगर- तालुक्यातील चिंचखेडा बु.॥ येथील 26 वर्षीय तरुण शेतकर्याने शेतातच गळफास घेवून आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रवींद्र विष्णु पाटील (26) असे मयत शेतकर्याचे नाव असून सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मुक्ताईनगर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रवींद्र हे सोमवारी शेतात पाण्याचा व्हॉल्व्ह सुरू करण्यासाठी जात असल्याचे सांगून निघाले मात्र न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता शेतातील बाभळीच्या झाडाने त्यांनी गळफास घेतल्याचे त्यांचे भाऊ ईश्वर विष्णु पाटील यांच्या निदर्शनास आले. ईश्वर पाटील यांनी मुक्ताईनगर पोलिसात खबर दिली. तपास हवालदार संदीप खंडारे करीत आहेत.