जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आज जळगावकर जनता कर्फ्यूचे समर्थन करताना दिसत आहेत. रस्ते सुनसान असून, जनता घरात आहे. नेहमीची वाहनांची वर्दळ सकाळपासून थांबली आहे.
कोरोना विषाणू, अर्थात कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्यानुसार आज रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कुणी आवश्यकता नसल्यास घरातून बाहेर पडू नये, जे कर्मचारी आणि नागरिक या साथीच्या आजाराशी मुकाबला करण्यासाठी काम करत आहेत अशा लोकांप्रती देशातील जनतेने आज संध्याकाळी ५ वाजता, पाच मिनिटांसाठी आभार व्यक्त करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.