मुंबई : महापालिकेने सांताक्रूझ (पूर्व) परिसरातील रहिवाशांना मुबलक पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी गेल्या मे महिन्यात घाईगर्दीने भूमिगत जलवाहिनी टाकली. पण जोडणीअभावी जलवाहिनी कोरडी पडून आहे. पालिकेच्या ‘अर्धवट राव’ कामाचा नमुना असल्याची नाराजी स्थानिकांत व्यक्त होत आहे.