जळगाव : माहेरहून 50 हजार रुपये न आणल्याने विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासू व सासरे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील महाबळ परीसरातील माहेर असलेल्या विवाहिता श्वेता राजा हरीत (40) यांचा विवाह वसंत नगर, वसई, मुंबई येथील राजा ब्रह्मानंद हरित यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला मात्र लग्नाच्या एक आठवड्यानंतर पती राजा ब्रह्मानंद हरीत यांनी माहेरहून 50 हजार रुपये आणावेत म्हणून विवाहितेला शिविगाळ करीत असह्य छळ केला तर सासू आणि सासरे यांनीदेखील गांजपाठ केला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता या जळगाव येथील महाबळ येथे माहेरी निघून आल्या. या संदर्भात गुरुवार, 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता तक्रार दिल्यानंतर पती ब्रह्मानंद हरीत, सासु माया ब्रह्मानंद हरीत, सासरे ब्रह्मानंद शामदेव हरीत (सर्व रा.वसंत नगर, वसई पूर्व, मुंबई) यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलिस कर्मचारी रत्ना मराठे करीत आहे.