जळगाव जिल्ह्यासाठी हे आहेत नवीन आदेश

जळगाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन नसेल पण राज्यभर १५ जूनपर्यंत कडक निर्बध असतील असे सांगितले होते. यामुळे राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत काढलेल्या आदेशा अंतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवारी सायंकाळी विशेष आदेश जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी ७ ते २ तरी तर इतर एकल दुकाने (single store) ९ ते २ या वेळेत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काय आहेत आदेश ?

१) अत्यावश्यक सेवा देणारी सर्व दुकाने दररोज सोमवारी ते शनिवारी सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहतील,

२) स्वतंत्र ठिकाणी असलेली (Standalone Single shops) इतर प्रकारचे सर्व दुकाने हे केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहतील. सदरची Non Essential दुकाने दर शनिवार व रविवार या दोनही दिवशी पूर्ण वेळ राहतील सर्व Essential व Non Essential प्रकारच्या दुकानाच्या प्रवेशाच्या ठिकाणी /काऊंटर समोर एका वेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही.

३) दुकान मालक / चालक यांनी दुकानांच्या दर्शनी भागात बैंक काउंटर प्रमाणे काच/ प्लास्टीकचे पारदर्शक शीट किंवा कमी खर्चात करावयाचे असल्यास पारदर्शक प्लास्टीक पडदा यांचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच सदर पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाण-घेवाण करता येईल एवढीच मोकळी जागा ठेवण्यात यावी.

४) अत्यावश्यक वस्तू व सेवांबाबत घरपोच वितरण सुविधा (Home deliveries) ह्या दररोज सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या वेळेत देता येतील. ई कॉमर्स सुविधेद्वारे Non Essential वस्तूंची सुविधा सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 या वेळेत देता येतील.

५) सर्व प्रकारची केश कर्तनालये (सलून), स्पा सेंटर्स, जिम पूर्णपणे बंद राहतील. 1

६) अत्यावश्यक कारणांव्यतिरीक्त दुपारी 02.00 वाजेनंतर नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी राहील.

७) सर्व शासकीय कार्यालयात (आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालये, पोलीस विभाग, अत्यावश्यक सेवा संबंधित कार्यालये वगळून) 25% कार्यालयीन उपस्थिती राहील. तथापि, कार्यालयीन उपस्थिती वाढविण्याबाबत कार्यालय प्रमुखांनी निर्णय घ्यावा.

८) जळगाव जिल्हा हा कृषीप्रधान असल्याने व मान्सूनपूर्व शेती विषयक कामे, पेरणी हंगाम सुरु असल्याने कृषी संबंधित सेवा पुरविणारी दुकाने हे दररोज सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या वेळेत सुरु ठेवता येतील.

९) माल वाहतूक / कार्गो वाहतूक सुरळीतपणे सुरु राहील. तसेच सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या वेळेनंतर देखील दुकानात केवळ माल भरण्याकरीता सुट राहील. तथापि सुट दिलेल्या वेळेनंतर दुकानातून ग्राहकास सेवा पुरविता येणार नाही. शासन आदेश दिनांक 12 मे 2021 अन्वये नियमांचे उल्लंघन करणारे दुकान मालक / चालक व घटक यांचेकडून रुपये 10,000/- मात्र दंड आकारण्यात येईल व पुन्हा चूक केल्याचे आढळून आल्यास कोबिड 19 चा संसर्ग कमी होईपावेतो सदचे दुकाने बंद ठेवण्यात येतील.

१०) वरील नमूद आस्थापनांच्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी / कामगार यांचे भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (वय वर्षे 45 वरील) लसीकरण करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच सदर कर्मचारी / कामगार यांची साप्ताहिक RTICR चाचणी करुन घेणे बंधनकारक राहील.

११)मॉर्निंग वॉक, सायकलोग, खुल्या मैदानातील व्यायाम याकरीता केवळ सकाळी 04.00 ते 08.00 यावेळेतच सुट राहील.